शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उमरीत अंगणवाडी पोषण आहार वाटप चौकशी संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंगणवाडी पोषण आहार खाद्यसामग्रीचे वाटप करण्यासाठी टेम्पो आला होता. ...

ठळक मुद्देसोमठाणा येथे पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंगणवाडी पोषण आहार खाद्यसामग्रीचे वाटप करण्यासाठी टेम्पो आला होता. यात बटाणा, मिरची पावडर, गूळ, हळद, सोयाबीन तेल, शेंगदाणा व मटकी अशी आठ प्रकारची खाद्यसामग्री अंगणवाडीला उतरविण्यात आली. यात दोन क्विंटल ३० किलोंऐवजी केवळ दीड क्विंटल बटाणा उतरविण्यात आला. यासंदर्भात संशयावरून गावकºयांनी पावती व प्रत्यक्षात उतरवण्यात आलेल्या मालाची तपासणी केली. यावेळी मोठी तफावत दिसून आली . म्हणून टेम्पोचालकाकडे चौकशी केली. त्याच्याकडून टेम्पोच्या चाव्या काढून घेण्यात आल्या. यावेळी पितळ उघडे पडण्याच्या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे गावकºयांचा संशय आणखी बळावला.दरम्यान, विस्ताराधिकारी पी. एल. जाधव यांनी पंचनामा केला. गावकºयांनी आज खाद्यसामग्रीच्या मालाने भरलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली केला. शनिवारी झालेल्या या घटनेनंतर तीन दिवस उलटले. तरीही कसलीच ठोस कारवाई झालेली नाही. २४ रोजी सोमवारी दुपारी उशिराने बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे हे उमरी येथे दाखल झाले .यावेळी सोमठाणा येथील सरपंच विरेंद्रसिंह चंदेल यांनी याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली याची विचारणा केली असता अद्यापपर्यंत कसलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी सांगितले. याबाबत सरपंच चंदेल यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या हवाली करण्यात आलेल्या टेम्पोमध्ये उर्वरित वाटपाचा माल पडून आहे. उर्वरित किती गावांना वाटप करणे बाकी आहे ? आतापर्यंत किती गावामध्ये वाटप झाले ? याबाबत कसलीच माहिती मिळू शकली नाही. टेम्पोचालक घटनास्थळावरून तीन दिवसांपासून गायब होण्याचे काय कारण असू शकते? नांदेड जिल्ह्यात कृष्णूर येथील अनाज कंपनीच्या रेशनचा धान्य घोटाळा गाजतो आहे. असे असताना उमरीच्या अंगणवाडी पोषण आहार वाटपाचा टेम्पो पकडल्यानंतर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे दिसत आहे. म्हणून या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत. याबाबतचा संशय वाढला आहे. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

सोमठाणा येथे ठेकेदाराने कमी माल दिला म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी ही आपली स्पष्ट भूमिका आहे. यात पूर्णपणे ठेकेदाराचा दोष आहे आपण कुणालाच पाठीशी घालणार नाही- ओमप्रकाश नगराळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, उमरी

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसraidधाडEducationशिक्षण