शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हौशी नाट्य राज्य स्पर्धा : 'माणसाळलेली रात्र'ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 3:25 PM

नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़ 

नांदेड : नाटक हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे. अनेक नामवंत लेखक, रंगकर्मींनी नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत़ आणि या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे. काळानुरूप लोकांचे विचार बदलले असले तरी आपल्या आजूबाजूस नवीन वेगवेगळ्या समस्या, प्रश्न उभे राहतात़ या प्रश्नावरही नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़ 

परभणीच्या प्रबोधन सेवाभावी संस्थेने सादर केलेले हे नाटक उदय कातनेश्वरकर यांनी लिहिलेले असन अनुजा डावरे यांनी दिग्दर्शित केले आहे़  हे संपूर्ण नाटक एका स्मशानभूमीत घडते़ स्मशानभूमीतील मसणजोगी (उदय कातनेश्वरकर ) याच्याशी विविध आत्मे थेट बोलत असतात. त्या ठिकाणी एक भुरटाचोर बाबल्या (भरड क्षिप्रसाधन) येतो़ त्याला स्मशानभूमीत जळत असलेल्या एका शवावरील दागिना लांबवायचा असतो़ या चोराचा भाऊ अपंग असतो़  त्याच्या दवाखान्यासाठी त्याला पैसे हवे असतात़ परंतु ज्याच्यासाठी त्याला पैसे हवे असतात, तो मयत झालेला असतो याची या चोराला माहीती नसते.

दरम्यान याच स्मशानभूमीत कार अपघातात मयत झालेली निलू (ऐश्वर्या डावरे) येते़ या निलून९ आपले स्वत:चे अवयव दान केलेले असतात. अशा पद्धतीने स्मशानभूमीत मसनजोग्यासह भुरटा चोर बाबल्या आणि मयत निलू एकत्र येतात़ या तिघांचेही विचार अतिशय भिन्न असतात़ मसनजोग्यास माणूस खूप दुष्ट आहे असे वाटत असते़ तर बाबल्याचा माणसावर विश्वास असतो़ तर निलूचे मत आणखीनच वेगळे असते़ माणूस कसाही असो, आपण आपल्या पद्धतीने चांगला विचार केला पाहिजे अशी ती सांगत असते़ या तिघांतील याच विषयावरील चर्चेतून मसनजोग्याचेही मत परिवर्तित होते़ 

संपूर्ण नाटकात दिग्दर्शकाचे काम उठून दिसते़ ऋग्वेद कुलकर्णी या बाल कलावंताने साकारलेली भूमिकाही लक्षवेधी ठरली आहे़ तर भरड क्षिप्रसाधन, उदय कातनेश्वरकर, ऐश्वर्या डावरे, संकेत पांडे यांनीही आपआपल्या भूमिकेस न्याय दिला आहे़  नाटकाचे नेपथ्य संकेत पांडे आणि संजय कातनेश्वरकर यांनी साकारले तर दिगंबर दिवाण यांची प्रकाश योजना सत्याचा आभास निर्माण करणारी होती. उषाताई डावरे यांनी रंगभूषा व वेशभूषेची बाजू सांभाळली तर संगीत उपेंद्र दुधगावकर आणि मंदार कातनेश्वरकर यांनी साकारले़ दरम्यान, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सरस्वती प्रतिष्टान, नांदेडच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित, सुहास देशपांडे दिग्दर्शित वारूळ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :artकलाNandedनांदेड