शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बोंढारच्या अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा: अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:44 IST

याप्रकरणी राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.

नांदेड: बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची झालेली हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांनी दिरंगाई न करता या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे. दरम्यान, कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

अक्षय भालेराव हत्याप्रकरणी ते म्हणाले की, २ जून रोजी सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून घटनाक्रम व तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही केली. लोकशाही व संविधानानुसार चालणाऱ्या भारतात | अशा घटना घडणे चुकीचे आहे. त्यामुळे सदर हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर व कठोर शिक्षा होऊन पीडित भालेराव कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आवश्यकता असल्याचे अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे. या प्रकरणामध्ये कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी