शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

नांदेड विभागातून आणखी ७५ किसान रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी ...

नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्याअखेरपर्यंत आणखी ७५ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतील. या रेल्वेंचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात; यामुळे शेतीमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स – टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात आल्याचे ते म्हणाले.

किसान रेल्वे व्यतिरिक्त नांदेड विभागाने या वर्षी मालवाहतुकीमध्ये बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकांवरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून ५ मक्याचे रेक पाठविले. हिंगोली रेल्वेस्थानकावरून तीन वर्षांच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले; तसेच मालटेकडी–नांदेड येथून गुळाचे ५ रेक पाठविण्यात आले आहेत. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती २८ किलोमीटर प्रतितास होती; यावर्षी ती वाढून ४५ किलोमीटर प्रतितास झाली आहे. यामुळेही मालवाहतूक वाढण्यास मदत झाल्याचे उपिंदर सिंघ यांनी सांगितले.