शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

नांदेड विभागातून आणखी ७५ किसान रेल्वे सोडण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी ...

नांदेड विभागातून पाठविलेल्या किसान रेल्वे संपूर्ण देशभर म्हणजेच न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालडा, आगरताळा, आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्याअखेरपर्यंत आणखी ७५ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येतील. या रेल्वेंचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रतितास या वेगाने धावतात; यामुळे शेतीमाल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स – टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वेला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात आल्याचे ते म्हणाले.

किसान रेल्वे व्यतिरिक्त नांदेड विभागाने या वर्षी मालवाहतुकीमध्ये बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकांवरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून ५ मक्याचे रेक पाठविले. हिंगोली रेल्वेस्थानकावरून तीन वर्षांच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले; तसेच मालटेकडी–नांदेड येथून गुळाचे ५ रेक पाठविण्यात आले आहेत. नांदेड विभागातील मालगाड्यांची गती २८ किलोमीटर प्रतितास होती; यावर्षी ती वाढून ४५ किलोमीटर प्रतितास झाली आहे. यामुळेही मालवाहतूक वाढण्यास मदत झाल्याचे उपिंदर सिंघ यांनी सांगितले.