शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मानव विकास मिशनच्या बसेसही विद्यार्थ्यांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस बंद होत्या. त्या शाळा सुरू झाल्याने पुन्हा नव्याने सुसाट धावत आहेत. आजघडीला जिल्ह्यात मानव ...

दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस बंद होत्या. त्या शाळा सुरू झाल्याने पुन्हा नव्याने सुसाट धावत आहेत. आजघडीला जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गतच्या ६३ बसेस धावत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने शालेय विद्यार्थिनींना शासनाच्या सहकार्यातून मोफत बससेवा दिली जाते. त्यासाठी शासनाच्यावतीने खास उपक्रम राबवून मानव विकास मिशनअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र बसेसही दिलेल्या आहेत. कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली एसटीसेवा पुन्हा नव्याने सुरू झाली असली, तरी अनेक ठिकाणची बससेवा अद्यापपर्यंत बंदच आहे. दरम्यान, शाळा सुरू झाल्याने मानव विकास मिशनच्या बसेससाठी ठरवून दिलेल्या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत. जवळपास ६३ बस असून, त्यातील १४ बस बिलोली, धर्माबाद आगाराअंतर्गत धावतात. तसेच नांदेड आगाराअंतर्गत १०, देगलूर - ७ बस, हदगाव - ७, किनवट - ७, कंधार - ४, तर उमरी आणि भोकर तालुक्यात १४ बस धावत आहेत. त्याचबरोबर मुलांना प्रवास करण्यासाठी असलेल्या सवलत पास वितरणाचेही काम सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवास करून शिक्षण घेता येत आहे.

नांदेडसह काही आगारात आजही दुर्गम भागातील बससेवा सुरू झालेली नाही. त्यात माहूर, किनवट, कंधार, बिलोली तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. तसेच बेलसर, चाभरा, माळकोठा आदी गावांतील बससेवा अद्यापपर्यंत सुरू नाही. त्यामुळे ज्या गावातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ये-जा करतात, त्या ठिकाणी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

काेरोनानंतर बससेवा पूर्ववत होण्याच्या मार्गावर

नांदेड आगारातून कोरोनापूर्वी नियमितपणे ११५ बसच्या माध्यमातून विविध फेऱ्या केल्या जात होत्या. परंतु, कोरोनामुळे लाॅकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत आजपर्यंत ९२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. परंतु, मानव विकास मिशनच्या पूर्वीप्रमाणेच दहा बसेस शालेय मुलींच्या सेवेत धावत आहेत.

पास देण्यास विलंब करू नये

शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीची सवलत पास देण्यासाठी विनाकारण विलंब केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर तक्रारी कराव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांना पासेस देण्यासाठी कोणत्याही अटी न लावता त्यांना तत्काळ पासेस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

- आकाश पाटील, विद्यार्थी

महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे. परीक्षा व इतर कामांसाठी शहरी भागात जावे लागते. तसेच महाविद्यालये सुरू न झाल्याने खासगी क्लासेस लावले आहेत. परंतु, आगारातून पासेस दिले जात नाहीत. महाविद्यालये कधी सुरू होतील तेव्हा सुरू होतील. परंतु, आयटीआय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध करून द्यावेत.

- वैभव कल्याणकर, विद्यार्थी

प्रवासी तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बससेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे लांब पल्ल्याच्या ठिकाणी बससेवा सुरू केली आहे. काही बस, त्यांचे चालक, वाहक हे मुंबईमध्ये कार्यरत आहेत. ते परतल्यानंतर पुन्हा जिल्हाअंतर्गत बसेसची संख्या वाढेल.

- वर्षा येरेकर, आगारप्रमुख, नांदेड