शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

धर्माबादचा तेलंगणात समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:57 AM

धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगंणात समावेश करण्याची लेखी मागणी केली आहे़ या मागणीमुळे खळबळ उडाली आहे़

ठळक मुद्देसरपंच संघटनेची मागणी : शासन, लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : धर्माबाद तालुका हा राज्याचे शेवटचे टोक असल्यामुळे शासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या प्रलंबित आहेत़ त्यामुळे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम यांनी तेलंगणा राज्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून धर्माबाद तालुक्याचा भाग तेलगंणात समावेश करण्याची लेखी मागणी केली आहे़ या मागणीमुळे खळबळ उडाली आहे़धर्माबाद हे शहर तेलगंणाच्या राज्याच्या सीमेवर आहे़ ६० टक्के जनता तेलगू भाषिक असून खरेदी विक्रीसाठी व्यापारी, शेतकरी, शेतमजूर तेलगंणात ये-जा करतात़ महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेपेक्षा तेलगंणातील योजना अनेक पटींनी चांगल्या असल्याचे मत तालुक्यातील जनतेचे झाले आहे़ खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी चार हजार रूपये शासन देत आहे.सदरील योजना महाराष्ट्र शासनानेही राबविण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ तसेच बाभळी बंधाºयाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने २२५ कोटी रूपये खर्च करून बंधारा बांधला़ मात्र हा बंधारा फक्त शोभेची वास्तु बनला आहे.महाराष्ट्रातील रस्ते व तेलगंणातील रस्ते यामध्येही जमीन अस्मानचा फरक आहे. निजामाच्या काळात धर्माबाद तालुक्याचा संपूर्ण भाग मुधोळ मंडळमध्ये समावेश होता. आजही जुनी कागदपत्रे मुधोळ तहसीलमधून नागरिक काढून आणत आहेत. योजनांच्या अंमलबजावणीबाबतही तेलंगणा सरस असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाटील कदम, शंकू पाटील होट्टे यांनी निझामाबादचे आ़ बाल रेड्डी, खा. कविता यांच्याकडे लेखी मागणी करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची झोप उडवली आहे.आगामी विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, सदरील मागणीमुळे जनतेत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी या मागणीचे स्वागतही केले आहे़ तर काही मात्र विरोधात आहेत़ लवकरच तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असून यात सर्वच राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग राहणार असल्याची प्रतिक्रियाही देण्यात आली़---धर्माबाद हे तेलंगणात समाविष्ट होणे शक्य नसून भाषेची व इतर गोष्टींची समस्या निर्माण होते़ केवळ योजनेसाठी राज्य बदलणे योग्य नाही, त्यापेक्षा तेलंगणातील योजना महाराष्ट्र सरकारने राबवावे हे महत्त्वाचे आहे़ तेलंगणात आताच्या मुख्यमंत्र्यांसारखे भविष्यात मुख्यमंत्री राहतील काय? -गणेशराव पा़ करखेलीकर, माजी सभापती, कृउबा समिती़---धर्माबाद तेलंगणात जाऊ शकत नाही ही स्टंटबाजी आहे़ धर्माबाद हे तेलंगणाच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करीत आहे़ तेलंगणात जाण्यापेक्षा राज्य सरकारवर दबाव आणून विकासाचे मुद्दे मांडणे योग्य राहील -विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष़

 

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाMLAआमदारMember of parliamentखासदार