शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:05 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे.

नांदेड : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा १०६ प्रकल्पांत मिळून केवळ ९.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.नांदेड जिल्ह्यात १०६ प्रकल्प आहेत. यात मानार आणि विष्णूपुरी या प्रकल्पांकडे मोेठे प्रकल्प म्हणून पाहिले जाते. मानार प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात २१.८७ दलघमी म्हणजेच १५.८२ टक्के पाणी उपलब्ध आहे. विष्णूपुरी प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ८३.५५ दलघमी आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ८.८३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून या पाण्याची टक्केवारी १०.९३ इतकी आहे. जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता १७९.९८ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांत ८.७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.२८ इतकी आहे. तर जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता १२१.७० दलघमी आहे. सद्य:स्थितीत या तीन बंधाऱ्यांत ७.६३ दलघमी उपयुक्त पाणी असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.३९ इतकी आहे. जिल्ह्यात ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता २१६.४५ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या ८८ प्रकल्पात केवळ १६.०८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून ही टक्केवारी ८.४१ एवढी आहे. तर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या चारही बंधा-यात सध्या ठणठणाट आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण