शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

कंधार तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ५७ लाख ५० हजार मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:48 IST

तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ६ लाख ५९ हजार १०९ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे़ या आठवड्यात शेतक-यांना अनुदान वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : तालुक्यात फेब्रुवारीमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती पीक व फळबागेचे नुकसान झालेल्या १८ गावांतील ८३६ शेतक-यांना २७ लाख ५७ हजार ९१० रूपयांचे अनुदान मंजूर झाले़ बारूळ गावशिवारातील ८८़०८ हेक्टर पिके बाधित झाली़ अशा ११६ शेतक-यांना तालुक्यातील सर्वाधिक ६ लाख ५९ हजार १०९ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे़ या आठवड्यात शेतक-यांना अनुदान वितरण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाईत अडकला आहे़ मागील वर्षीचा खरीप हंगाम अत्यल्प पावसाने हातचा गेला़ तरीही अनेक शेतकºयांनी रबी पिकाची लागवड केली़ रबी, फळपीक, बागायती पिकावर शेतकºयांनी लक्ष केंद्रित केले़ परंतु निसर्गाचा लहरीपणा पुन्हा आडवा आहे़ फेब्रुवारी महिन्यातील दुसºया आठवड्यात गारपीट, अवकाळी पावसाने पिकावर संक्रांत आणली़ महसूल, कृषी, पंचायत आदी यंत्रणेने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले़ शेतकरी संख्या व बाधित क्षेत्राची आकडेवारी संकलित करून अहवाल प्रशासनाला सादर केला़ प्रशासनाने सर्व माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवून दिली़ राज्य शासनाने शेती नुकसानीची दखल घेऊन अनुदान मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़तालुक्यात सर्वाधिक अनुदान बारूळ गावातील ११६ शेतकºयांना ६ लाख ५९ हजार १०९ रूपये आहे़ काटकळंबा - १८४ शेतकºयांना ५ लाख १९ हजार १७५, गऊळ -१४२ शेतकºयांसाठी ३ लाख ५३ हजार ४५६, पानशेवडी-८३ शेतकºयांना २ लाख ६४ हजार ६६५, रुई- ६७ शेतकºयांसाठी १ लाख ६६ हजार ८३५, नागलगाव- २३ शेतकºयांसाठी १ लाख २० हजार १४५ आणि कल्हाळी येथील १४७ शेतकºयांसाठी २ लाख ५२ हजार ४० रुपये अनुदान उपलब्ध झाले़ रबी पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ५०० आणि फळबागेसाठी हेक्टरी १८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले़ अनुदान वितरण केल्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे़ तहसीलदार अरुणा संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम जोशी प्रयत्न करीत आहेत़ जिल्हा बँकेला अनुदान रकमेचा धनादेश दिला जाणार आहे़ या आठवड्यात शेतकºयांना अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे़१८ गावे : ८३६ शेतकºयांचे नुकसानगारपीट-अवकाळी पावसाने १८ गावातील ८३६ शेतकºयांचे ३१९़८५ हेक्टर वरील पीक, फळबाग, बागायतीचे नुकसान झाले़ शासनाकडून यासाठी २७ लाख ५७ हजार ९१० रूपये अनुदान उपलब्ध झाले़ त्यात पोखर्णी- ३ शेतकºयांसाठी ५ हजार ४००, दैठणा- १ (२,७०० रूपये), घागरदरा- २१ (५२ हजार १२० रूपये), सोमठाणा- १ (५४०० रूपये ), आंबुलगा -१३ (१ लाख १५ हजार २००), वरवंट- १ (८१६० रूपये), माजरे वरवंट- ३ (८१६० रूपये), चौकीपाया - २५ (१ लाख ३५ हजार ३२० रूपये), तळ्याची वाडी - २ (५० हजार ६२५ रूपये), पेठवडज - २ (३६ हजार), सावरगाव- २ (३४०० रूपये) मंजूर झाले़

टॅग्स :HailstormगारपीटFarmerशेतकरीMONEYपैसाState Governmentराज्य सरकार