शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:58 IST

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ: मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे.मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.मानार प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी १९६४ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या प्रकल्पासाठी सात गावे स्थलांतरीत करण्यात आली. २ हजार ८६० हेक्टर जमीन कंधार तालुक्यातील गेली. १४६.९२ दलघमी जलसाठा असलेला हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील नागरिक व शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पावर २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. बारुळ, बाचोटी, बहाद्दरपूरा, तेलूर,वरवट, धर्मापुरी, चिंचोली येथील सुमारे १५० भोई समाजाचा मच्छ व्यवसाय चालतो.बारुळ मानार प्रकल्प इ. स. २०१६-१७ मध्ये तुडुंब भरला होता. सलग दोन वर्षापासून मात्र प्रकल्प पन्नास टक्क्याच्यावर पाणीसाठा गेला नाही. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये प्रकल्पात या महिन्यात ३० साठा होता. यंदा २०१८-१९ आॅक्टोबरमध्ये आजरोजी प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मच्छ व्यवसाय, सिंचनावर संकट येणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. बारुळ परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला.सोयाबीन उत्पादनात घटबारुळ मंडळातील ३८ गावांत शेतक-यांनी सोयाबीन पीक घेतले होते. प्रारंभी पिकाला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. या काळात पिकावर ‘करपा’ रोग पडला. त्यामुळे उत्पन्नावर घट झाली. पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई