शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘मानार’ मध्ये ४१ टक्केच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:58 IST

मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे. मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबारुळ: मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा असून यंदा परतीच्या पावसावर प्रकल्प भरेल, अशी आशा बळीराजा करु लागला आहे.मानार प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा राहिला असल्याने नायगाव, बिलोली, धर्माबाद या ठिकाणचा पिण्याचा व सिंचना प्रश्न निर्माण झाला आहे. सलग दुसऱ्या दुसºया वर्षीही प्रकल्प भरला नाही.मानार प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते १५ जानेवारी रोजी १९६४ रोजी करण्यात आले. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.या प्रकल्पासाठी सात गावे स्थलांतरीत करण्यात आली. २ हजार ८६० हेक्टर जमीन कंधार तालुक्यातील गेली. १४६.९२ दलघमी जलसाठा असलेला हा प्रकल्प कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील नागरिक व शेतकºयांसाठी वरदान ठरला आहे. या प्रकल्पावर २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. बारुळ, बाचोटी, बहाद्दरपूरा, तेलूर,वरवट, धर्मापुरी, चिंचोली येथील सुमारे १५० भोई समाजाचा मच्छ व्यवसाय चालतो.बारुळ मानार प्रकल्प इ. स. २०१६-१७ मध्ये तुडुंब भरला होता. सलग दोन वर्षापासून मात्र प्रकल्प पन्नास टक्क्याच्यावर पाणीसाठा गेला नाही. मागील वर्षी २०१७-१८ मध्ये प्रकल्पात या महिन्यात ३० साठा होता. यंदा २०१८-१९ आॅक्टोबरमध्ये आजरोजी प्रकल्पात ४१ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मच्छ व्यवसाय, सिंचनावर संकट येणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे. बारुळ परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाला.सोयाबीन उत्पादनात घटबारुळ मंडळातील ३८ गावांत शेतक-यांनी सोयाबीन पीक घेतले होते. प्रारंभी पिकाला चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. या काळात पिकावर ‘करपा’ रोग पडला. त्यामुळे उत्पन्नावर घट झाली. पावसाच्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई