शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

संवाद मेळाव्यात ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा वीज बिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:12 AM

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, वीज जोडणी धोरणासोबतच अनेक वर्षांपासून थकीत कृषिपंपांचे वीज ...

नांदेड : महाकृषी ऊर्जा अभियान हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, वीज जोडणी धोरणासोबतच अनेक वर्षांपासून थकीत कृषिपंपांचे वीज बिल कोरे करण्याची नामी संधी आहे. थकीत बिलापैकी ५० टक्के भरून उर्वरित ५० टक्के रक्कम ही पूर्णपणे माफ होणार आहे. त्यामुळे हे केवळ अभियान नसून शाश्वत शेतीची स्वप्नपूर्ती करणारे अभियान आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घेवून कृषिपंपांची थकबाकी कोरी करावी, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे. या संवाद मेळाव्यात ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा वीज बिल भरणा केला.

महाकृषी ऊर्जा अभियानासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उमरी उपविभागातील शिंदी या गावात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिंदी गावाचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन गोपूलवाड, उपकार्यकारी अभियंता बोडके, गोविंदराव पाटील शिंदीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पडळकर म्हणाले, महाकृषी ऊर्जा अभियानात पाच वर्षांपूर्वीच्या सर्व उच्च व लघुदाब कृषी पंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार शंभर टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याज दरानुसार आकारण्यात येत आहे. त्याच त्याचबरोबर वसूल झालेल्या बिलातील ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व ३३ टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यातील विद्युत यंत्रणांच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत आपली थकबाकी कोरी करावी.

चौकट

शिंदी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने सौर कृषी वीजवाहिनीसाठी ४० एकर गायरान जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच प्रभाकर पाटील पुयड यांच्यासह सर्व सदस्यांचे पडळकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी मुख्य अभियंता पडळकर यांनी केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत ३३ शेतकऱ्यांनी ४ लाख ९१ हजार रुपयांचा थकीत वीज बिल भरणा केला.