शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात, नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:23 IST

आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

नांदेड- नितीशकुमार पुन्हा भाजपासोबत गेले आहेत. त्यावरुन मला लोकसभेतील लालू प्रसाद यांचे भाषण आठवते. आपल्या तोंडात ३२ दात असतात. मात्र नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात आहेत, असे ते म्हणाले होते. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

काँग्रेसच्या महिला मेळाव्यासाठी रविवारी नाना पटोले हे नांदेडात आले होते. ते म्हणाले, २०१४ पासून आतापर्यंतच्या काळात नितीमत्ता अन् सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचे पाप भाजपाने केले आहे. भ्रष्टाचाराने पैसे कमवा, लोकांना विकत घ्या नाहीतर ईडी आणि सीबीआयचा वापर करा असे सुरु आहे. राजकीय नितीमत्ता संपविण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता आली आहे. बहुमताचे सरकार पाडणे सुरु आहे. महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराला मुठमाती देण्याचे काम केले. या राज्यात सध्या भ्रष्ट सरकार काम करीत आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुकीत भाजपला घरी पाठविण्याचा मानस जनतेने केला आहे, असेही पटोले म्हणाले.

आठ ते दहा दिवसात जागा वाटप निश्चित

येत्या ३० तारखेला इंडीया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आले आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. ते किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील. येत्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील जागा वाटप निश्चित होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवर दावा केल्याचा विषयावर पटोले यांनी असे आता चालतच राहणार आहे. आठ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल असे सांगितले.

नितीश कुमार पलटूराम-चेन्नीथला

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची भाजपाला भीती वाटत आहे. त्यामुळे राहूल गांधी यांच्यावर बिनबोभाट आरोप केले जात आहेत. नितीश कुमार यांच्याबाबत काय बोलणार? आतापर्यंत ते किती वेळा पलटले आहेत. ते पलटूराम आहेत. उद्या आमच्यासोबतही येवू शकतात. त्यामुळे त्यांच्या बद्दल न बोललेच बरे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNitish Kumarनितीश कुमार