जिल्ह्यात २१२ बाधित तर पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:57+5:302021-05-27T04:19:57+5:30
२२५ जणांनी केली कोरोनावर मात जिल्ह्यात बुधवारी २२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ५, उमरी ...

जिल्ह्यात २१२ बाधित तर पाच जणांचा मृत्यू
२२५ जणांनी केली कोरोनावर मात
जिल्ह्यात बुधवारी २२५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ५, उमरी ३, मुखेड ८, अर्धापूर ५, लोहा ५, खाजगी रुग्णालय ६०, जिल्हा रुग्णालय ११, कंधार ७, मुदखेड ५, नायगाव २, किनवट ७, एनआरआय व गृहविलगीकरण ६८, बारड २, हिमायतनगर २९, धर्माबाद १ आणि माहूर तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. तर तुळशीरामनगर नांदेड, उंदरी ता. मुखेड, हडको नांदेड, हदगाव, पीरबुर्हाणनगर नांदेड येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०६, आयुर्वेद रुग्णालय ९०, जिल्हा रुग्णालय ९८ आणि भक्ती कोविड सेंटरमध्ये ३५ खाटा रिक्त आहेत. उपचार घेत असलेल्या १ हजार ५८५ जणांमध्ये ६१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.