प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:39+5:302020-12-30T04:23:39+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. ...

20 places under each water tank | प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिकाशहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिका

Web Title: 20 places under each water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.