शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

नांदेड जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २० टक्के जादा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:44 IST

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पण त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची क्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पण त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची क्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पात आजघडीला केवळ ५२.९३ दलघमी साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात असलेल्या मध्यम प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून ५०.१६ दलघमी पाणी मध्यम प्रकल्पात जमा झाले आहे.जिल्ह्यात असलेल्या उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये ९१.८२ दलघमी असून या पाण्याची टक्केवारी ५० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची जलक्षमता २१७ दलघमी इतकी असताना १३४ दलघमी जलसाठा आजघडीला लघू प्रकल्पामध्ये उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात लघू, मध्यम, मोठे आदी १०७ प्रकल्प आहेत.या प्रकल्पात ८२० दलघमी जलसाठा होऊ शकतो. त्यात आजघडीला ४२५.४७ दलघमी साठा उपलब्ध आहे. एकूण साठा ५७.३६ इतका आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या कोल्हापुरी बंधाºयात मात्र एक थेंबही पाणी यंदाही साठले नाही. जिल्ह्यात ४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाºयांची क्षमता ७.४४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र एक थेंबही पाणी साठवता आले नाही. कोल्हापुरी बंधाºयाची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात असली तरी देखभाल व दुरुस्तीअभावी मागील काही वर्षांपासून कोल्हापुरी बंधारे निकामी झाले आहेत.नांदेड पाटबंधारे मंडळात १२५१ दलघमी जलसाठानांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत नांदेडसह हिंगोली, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांतील प्रकल्पांचा समावेश होतो. नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १४५ प्रकल्प असून या प्रकल्पांची जलक्षमता ३३९१ दलघमी इतकी आहे. आजघडीला नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १२५१ दलघमी जलसाठा उपलब्ध असून ४६.४४ टक्के इतकी त्याची टक्केवारी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पाचा नांदेड जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. गतवर्षी आॅगस्टअखेर इसापूर प्रकल्पात केवळ ६.९४ टक्के साठा होता. यावर्षी मात्र इसापूरच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून ६७ टक्के अर्थात ४४८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प