शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

नांदेड जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा २० टक्के जादा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:44 IST

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पण त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची क्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के जलसाठा आॅगस्टअखेर उपलब्ध झाला आहे. गतवर्षी आॅगस्ट अखेर जिल्ह्यात २७६ दलघमी अर्थात ३७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यावर्षी आॅगस्टअखेर ४२५ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून या साठ्याची टक्केवारी ५७ टक्के इतकी आहे.जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पांपैकी विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. पण त्याचवेळी दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात केवळ ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मानार प्रकल्पाची क्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पात आजघडीला केवळ ५२.९३ दलघमी साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात असलेल्या मध्यम प्रकल्पात ६३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून ५०.१६ दलघमी पाणी मध्यम प्रकल्पात जमा झाले आहे.जिल्ह्यात असलेल्या उच्चपातळी बंधाऱ्यामध्ये ९१.८२ दलघमी असून या पाण्याची टक्केवारी ५० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात एकूण ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची जलक्षमता २१७ दलघमी इतकी असताना १३४ दलघमी जलसाठा आजघडीला लघू प्रकल्पामध्ये उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात लघू, मध्यम, मोठे आदी १०७ प्रकल्प आहेत.या प्रकल्पात ८२० दलघमी जलसाठा होऊ शकतो. त्यात आजघडीला ४२५.४७ दलघमी साठा उपलब्ध आहे. एकूण साठा ५७.३६ इतका आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या कोल्हापुरी बंधाºयात मात्र एक थेंबही पाणी यंदाही साठले नाही. जिल्ह्यात ४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाºयांची क्षमता ७.४४ दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र एक थेंबही पाणी साठवता आले नाही. कोल्हापुरी बंधाºयाची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात असली तरी देखभाल व दुरुस्तीअभावी मागील काही वर्षांपासून कोल्हापुरी बंधारे निकामी झाले आहेत.नांदेड पाटबंधारे मंडळात १२५१ दलघमी जलसाठानांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत नांदेडसह हिंगोली, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांतील प्रकल्पांचा समावेश होतो. नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १४५ प्रकल्प असून या प्रकल्पांची जलक्षमता ३३९१ दलघमी इतकी आहे. आजघडीला नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १२५१ दलघमी जलसाठा उपलब्ध असून ४६.४४ टक्के इतकी त्याची टक्केवारी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पाचा नांदेड जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. गतवर्षी आॅगस्टअखेर इसापूर प्रकल्पात केवळ ६.९४ टक्के साठा होता. यावर्षी मात्र इसापूरच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून ६७ टक्के अर्थात ४४८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प