शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार; धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 15:18 IST

पाचपावलीतील घटना, चौघांना अटक

नागपूर : उपराजधानीत नव्या वर्षाची सुरुवात खुनाच्या घटनेने झाली आहे. पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर रविवारी दिवसाढवळ्या एका युवकाचा खून करण्यात आल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.

राजेश विनोद मेश्राम (२५, समतानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मनोज नारायण गुप्ता (३०, कपिलनगर), शुभम उर्फ दादू हिरामण डोंगरे (३०,संतानगर), विपिन उर्फ जॅकी रामपाल विश्वकर्मा (२७, बाबादीपनगर), पीयुष भैसारे (२२, रा. वैशालीनगर) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून इमरान वहिद मलिक (ताजनगर) हा आरोपी अद्यापही फरार आहे. राजेश मेश्राम वाहन चालक होता. त्याची मनोजशी जुनी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. मनोज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो राजेशचा काटा काढण्याच्या तयारीत होता. राजेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही.

रविवारी सकाळी मनोज आपल्या साथीदारांसह शस्त्र घेऊन राजेशच्या घरी पोहोचला. कुटुंबीयांनी राजेश कामावर गेल्याचे त्याला सांगितले. मनोजने राजेशचा भाऊ राजू मेश्रामची पत्नी मनप्रीतला राजेशचा खून करण्याची धमकी दिली. त्यानंतर मनोज आणि त्याचे साथीदार निघून गेले. राजेश सकाळी १०.३० वाजता बाईकवर स्वार होऊन वैशालीनगर सिमेंट रोडवर पोहोचला. तेथे बाईकवरून उतरून तो खर्रा घेत होता. तेवढ्यात मनोज आपल्या साथीदारांसोबत कार क्रमांक एम. एच. ४९, ए. एस-८७६० ने तेथे पोहोचला. त्यांनी राजेशला घेराव घातला. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळी लहान मुले खेळत होते.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुले आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्यामुळे ते पळत सुटले. दरम्यान राजेशही जीव वाचविण्यासाठी जवळच्या एका घराच्या गच्चीवर गेला. हे पाहून हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी या घटनेची पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी राजेशला रुग्णालयात पोहोचविले. त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा जीव गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपी आणि त्यांची कार दिसली.

चार दिवसात झाले दोन खून

पाचपावली ठाण्याच्या परिसरात २५ डिसेंबरला शंकर कोत्तुलवारचा खून करण्यात आला होता. त्याच्या चार दिवसानंतर दुसरी घटना घडली. पाचपावलीतील पोलिस धान्य माफिया सोनु, टेकाचा सट्टेबाज सलमान आणि सुपारी गुटख्याची माहिती घेण्यात व्यस्त आहेत. दोन महिन्यांपूर्वी डीबी पथकाचे मुख्य आणि त्यांचे कर्मचारी गुटखा-तंबाखूवर कारवाई करीत होते. परंतु गुन्हेगारी रोखण्यात ते प्राथमिकता देत नव्हते. अचानक डीबी पथकाच्या हृदय परिवर्तनामुळे वरिष्ठ अधिकारीही चिंतेत आहेत. कोत्तुलवारच्या खुनातही सुरुवातीला एक आरोपी तथा पगंत उडविण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच आरोपींना अटक करून वैमनस्यातून खून झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर