शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तरंजित थरार; धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 15:18 IST

पाचपावलीतील घटना, चौघांना अटक

नागपूर : उपराजधानीत नव्या वर्षाची सुरुवात खुनाच्या घटनेने झाली आहे. पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर रविवारी दिवसाढवळ्या एका युवकाचा खून करण्यात आल्यामुळे पोलिसात खळबळ उडाली आहे.

राजेश विनोद मेश्राम (२५, समतानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मनोज नारायण गुप्ता (३०, कपिलनगर), शुभम उर्फ दादू हिरामण डोंगरे (३०,संतानगर), विपिन उर्फ जॅकी रामपाल विश्वकर्मा (२७, बाबादीपनगर), पीयुष भैसारे (२२, रा. वैशालीनगर) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून इमरान वहिद मलिक (ताजनगर) हा आरोपी अद्यापही फरार आहे. राजेश मेश्राम वाहन चालक होता. त्याची मनोजशी जुनी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. मनोज गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तो राजेशचा काटा काढण्याच्या तयारीत होता. राजेशने त्याला गांभीर्याने घेतले नाही.

रविवारी सकाळी मनोज आपल्या साथीदारांसह शस्त्र घेऊन राजेशच्या घरी पोहोचला. कुटुंबीयांनी राजेश कामावर गेल्याचे त्याला सांगितले. मनोजने राजेशचा भाऊ राजू मेश्रामची पत्नी मनप्रीतला राजेशचा खून करण्याची धमकी दिली. त्यानंतर मनोज आणि त्याचे साथीदार निघून गेले. राजेश सकाळी १०.३० वाजता बाईकवर स्वार होऊन वैशालीनगर सिमेंट रोडवर पोहोचला. तेथे बाईकवरून उतरून तो खर्रा घेत होता. तेवढ्यात मनोज आपल्या साथीदारांसोबत कार क्रमांक एम. एच. ४९, ए. एस-८७६० ने तेथे पोहोचला. त्यांनी राजेशला घेराव घातला. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळी लहान मुले खेळत होते.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मुले आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्यामुळे ते पळत सुटले. दरम्यान राजेशही जीव वाचविण्यासाठी जवळच्या एका घराच्या गच्चीवर गेला. हे पाहून हल्लेखोर पळून गेले. नागरिकांनी या घटनेची पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी राजेशला रुग्णालयात पोहोचविले. त्यावेळी त्याचा श्वास सुरू होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा जीव गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात आरोपी आणि त्यांची कार दिसली.

चार दिवसात झाले दोन खून

पाचपावली ठाण्याच्या परिसरात २५ डिसेंबरला शंकर कोत्तुलवारचा खून करण्यात आला होता. त्याच्या चार दिवसानंतर दुसरी घटना घडली. पाचपावलीतील पोलिस धान्य माफिया सोनु, टेकाचा सट्टेबाज सलमान आणि सुपारी गुटख्याची माहिती घेण्यात व्यस्त आहेत. दोन महिन्यांपूर्वी डीबी पथकाचे मुख्य आणि त्यांचे कर्मचारी गुटखा-तंबाखूवर कारवाई करीत होते. परंतु गुन्हेगारी रोखण्यात ते प्राथमिकता देत नव्हते. अचानक डीबी पथकाच्या हृदय परिवर्तनामुळे वरिष्ठ अधिकारीही चिंतेत आहेत. कोत्तुलवारच्या खुनातही सुरुवातीला एक आरोपी तथा पगंत उडविण्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर पाच आरोपींना अटक करून वैमनस्यातून खून झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर