शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नागपुरात १० हजारासाठी युवकाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:48 IST

यासीन प्लॉट सक्करदरा परिसरात एका २० वर्षीय युवकाचे अपहरण करून १० हजार रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देयासीन प्लॉट सक्करदरा भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यासीन प्लॉट सक्करदरा परिसरात एका २० वर्षीय युवकाचे अपहरण करून १० हजार रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.बिट्टू मिर्झा, गौरव टाले आणि सोहेल नावाचा साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. अमर्त दिवे (२०) रा. म्हाळगीनगर असे फिर्यादीचे नाव आहे. अमर्त शनिवारी सकाळी १०.३० वाजता गाडीने यासीन प्लॉटमधील गॅस गोदामाच्या गल्लीतून जात होता. तेव्हा आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्याला ताजबागसमोरील मैदानात नेऊन १० हजार रुपयाची खंडणी मागितली. पैसै न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी यापूर्वीसुद्धा त्याला धमकावून पानटपरीवरची त्यांची १००० व १२०० रुपयांची उधारी चुकती करण्यास सांगितले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.खंडणीसाठी बारमध्ये हल्लासक्करदऱ्यातील आशीर्वादनगर येथील बारमध्ये रविवारी रात्री तलवारी घेऊन गुन्हेगारांनी हल्ला करीत १० हजार रुपयाची खंडणी मागितली.रमजान, अक्षय ऊर्फ दादू बालबुद्धे आणि त्याचे दोन साथीदार, अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास बार संचालक संदीप लखनलाल बनोदे (४९) हे बारमध्ये असताना आरोपी हातात तलवारी घेऊन आत आले. त्यांनी बनोदे यांना परिसरात बार चालविण्यासाठी १० हजाराची खंडणी मागितली. नकार दिल्यावर तलवारीने बारमध्ये तोडफोड केली तसेच बनोदे यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, तोडफोड आदी गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण