शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

संत्रा बागेचे ओलित करणे जीवावर बेतले; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 16:40 IST

बेलाेना शिवारातील घटना

बेलाेना (नागपूर) : संत्रा बागेचे ओलित करताना शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप वारंवार बंद पडायचा. त्यामुळे तरुणाचे पेटीतील वीजप्रवाह तपासून पाहायला सुरुवात केली आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असून, ही घटना नरखेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेना शिवारात शुक्रवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

युगल गजानन बारमासे (१७, रा. बेलोना, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. युगल त्याच्या आई व आजीसाेबत शेतात संत्र्याच्या बागेचे ओलित करण्यासाठी गेला हाेता. माेटरपंप सतत बंद हाेत असल्याने त्याने नेहमीप्रमाणे पेटीतील वीजप्रवाह तपासायला सुरुवात केली. त्यातच त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच शेजारच्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. ताेपर्यंत त्याचा मृत्यू झाला हाेता.

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश बोथले, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित घोडे, शाखा अभियंता सलीम शेख यांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

विजेच्या कमी-अधिक दाबाला जबाबदार काेण?

युगल हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा हाेता. त्याला तीन बहिणी आहेत. ताे धार्मिक प्रवृत्तीचा हाेता. कृषिपंपांना दिली जाणारी वीज कमी दाबाची असते. त्यातच माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून, दिवसा वीजपुरवठा सुरळीत असल्यास बागा व पीक जगवण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करतात. कृषिपंपाला पूर्ण दाबाच्या विजेचा पुरवठा केला असता तर माेटरपंप बंद झाला नसता. शिवाय, युगलचा जीव गेला नसता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर