शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

युवक काँग्रेसचा वाद पेटला, कुणाल राऊत हटावसाठी दिल्लीवारी

By कमलेश वानखेडे | Updated: January 21, 2025 14:55 IST

कारवाई झालेले पदाधिकारी आक्रमक : राष्ट्रीय अध्यक्ष व प्रभारींकडे तक्रार करणार

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संघ मुख्यालयावरील मोर्चात सहभागी न झाल्याचे कारण देत प्रदेश युवक काँग्रेसने ६० पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला असून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली जाणार आहे.

युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे, अक्षय हेटे यांच्यासह ६० जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईने संबंधित पदाधिकारी कमालीचे दुखावले आहेत. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत कुणाल राऊत यांना मतदान न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ते ठरवून टार्गेट करीत असल्याचा गंभीर आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. युवक काँग्रेस हे पक्षाचे संघटन आहे. ही कुणाची प्रायव्हेट लि. कंपनी नाही. त्यामुळे संघटनेचे काम नियमानुसार चालायला हवे. आंदोलनाची माहिती अगदी एक दिवसापूर्वी देण्यात आली. कुणाचे वडिल, कुणाची आई तर कुणाची पत्नी हॉस्पीटलमध्ये भरती होती. पदाधिकारी आंदोलनात अनुपस्थित होते तर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागायला हवे होते. त्यावर समाधान झाले नाही तर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे न करता केवळ राजकीय आकसापोटी कार्यमुक्तची कारवाई करण्यात आली. ही सर्व बाजू आता कारवाई झालेले पदाधिकारी दिल्लीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावेरु यांच्याकडे मांडणार आहेत.

बंटी शेळके यांनाही सूचना नाहीबंटी शेळके हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत. ते विधानसभा निवडणूक लढलेल्या मतदारसंघात हे आंदोलन होते. मात्र, केवळ क्रेडिट घेण्यासाठी त्यांनाही या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.९ महिन्यांपासून प्रदेशची बैठक नाहीकुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अध्यक्ष म्हणून गेल्या ९ महिन्यांपासून त्यांनी प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतलेली नाही. राऊत हे निष्क्रीय असल्यामुळे त्यांनाच तत्काळ पदमुक्त करावे, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का ?

विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय महसाचिव प्रियंका गांधी यांचा पश्चिम नागपूर व मध्य नागपुरात ‘रोड शो’ला आयोजित करण्यात आला होता. कुणाल राऊत हे नागपुरात असूनही या ‘रोड शो’ मध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना याचा जाब विचारण्यात यावा, अशीही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर