शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:16 IST

Young farmer set out on Bharat Bhraman by bicycle काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे.

ठळक मुद्दे१५ राज्य, ८० शहरे व ११ हजार किमीचा प्रवास : वारसास्थळे संवर्धनाचा संदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे. सुनील थाेरात नामक हा २२ वर्षाचा तरुण सहा राज्यातून ४८५० किलाेमीटरचा प्रवास करून शुक्रवारी रात्री नागपूरला पाेहचला.

सुनील साहेबराव थाेरात हा देवळाणा, जि. औरंगाबाद येथील तरुण गावी जैविक शेती करताे. आयुष्यात एकदा आपला देश फिरावा, हे त्याचे स्वप्न पण कसे हा सवाल. एकदा औरंगाबादजवळच्या वारसा स्थळांना भेट दिली असता, तिथे झालेल्या विद्रुपीकरणाने ताे अस्वस्थ झाला. ऐतिहासिक महत्त्व असलेली ही स्थळे जतन करण्याचा संदेश लाेकांना द्यावा, असा निश्चय त्याने केला. इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते खाेटे नाही. आपले दाेन्ही स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग त्याला सापडला. २० डिसेंबर राेजी त्याने आपली सायकल उचलली आणि निघाला प्रवासाला. अर्थात घरच्यांचे पाठबळ हाेतेच साेबत पण खिशात केवळ ४५०० रुपये हाेते.

औरंगाबादहून निघाल्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू (काेईंबतूर), केरळ व कन्याकुमारी गाठली. पुढे कर्नाटक, आंध्रप्रदेश हाेत तेलंगणाचा हैदराबाद व आदिलाबादमार्गे सुनील नागपूरला पाेहचला. या प्रवासात त्याने तुळजापूर, विजापूर, बदामी, पट्टडकल, हम्पी, म्हैसूर पॅलेस, केरळचा पश्चिम घाट, इद्दुकी धरण, सबरीमाला मंदिर, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुरै (मीनाक्षी मंदिर), तिरुचिराप्पल्ली, तंजूवरचा शिलालेख, कृष्णगिरी, होसूर, बेंगळुरू तसेच हैदराबादला गोलकोंडा किल्ला, चारमीनार, सालारजंग संग्रहालय, संघी मंदिर, बिर्ला मंदिराला भेट दिली. नागपुरात दाेन दिवस मुक्कामात वारसा स्थळांना भेटी देत ताे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली हाेत मनाली, लेह लद्दाख, कारगीलमार्गे काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात भ्रमण करीत पुन्हा महाराष्ट्र गाठणार आहे. अशाप्रकारे १५ राज्यातील ८० शहरांच्या भारतीय व जागतिक वारसा स्थळांना ताे भेटी देत ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करणार आहे. असा हा १२० दिवसांचा प्रवास असून पुढल्या ५० दिवसात त्याला ६१५० किलाेमीटरचे अंतर पादाक्रांत करायचे आहे.

माझी ही सायकल राईड भारतीय सैनिकांना व पाेलिसांना समर्पित आहे. वारसा स्थळ जतन करण्यासह आराेग्य आणि पर्यावरण हाही संदेश मला द्यायचा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती कशी आहे, तिथले लोक कसे आहेत. याचा अभ्यास करायचा होता. ४५०० रुपये घेऊन निघालाे पण प्रवासात लाेकांनी खूप मदत केली.

- सुनील थाेरात, सायकल राईडर

त्या किर्र अंधारात मी एकटा

केरळच्या घाटावरून चालत असताना रात्र झाली हाेती आणि अचानक सायकल पंक्चर झाली. भाषांच्या अडथळ्यात पुढले सुरक्षित ठिकाण गाठायचे हाेते. त्या किर्र अंधारात मी सायकल ढकलत चालत हाेताे. अशावेळी त्या मार्गे जाणाऱ्या वन विभाग व पाेलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली. हैदराबादमध्ये असाच एकाने समाेर येऊन गळा दाबला हाेता. हे काही कटू प्रसंग आहेत पण बरेच चांगले अनुभव आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतCyclingसायकलिंग