शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

सायकलने भारतभ्रमणावर निघाला तरुण शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 00:16 IST

Young farmer set out on Bharat Bhraman by bicycle काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे.

ठळक मुद्दे१५ राज्य, ८० शहरे व ११ हजार किमीचा प्रवास : वारसास्थळे संवर्धनाचा संदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : काेराेना महामारीच्या काळात सायकलस्वारी हे फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचे साधन ठरले आहे. मात्र औरंगाबादचा एक तरुण शेतकरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वारसा स्थळांचे संवर्धन करण्याचा संदेश देत सायकलने भारतभ्रमणावर निघाला आहे. सुनील थाेरात नामक हा २२ वर्षाचा तरुण सहा राज्यातून ४८५० किलाेमीटरचा प्रवास करून शुक्रवारी रात्री नागपूरला पाेहचला.

सुनील साहेबराव थाेरात हा देवळाणा, जि. औरंगाबाद येथील तरुण गावी जैविक शेती करताे. आयुष्यात एकदा आपला देश फिरावा, हे त्याचे स्वप्न पण कसे हा सवाल. एकदा औरंगाबादजवळच्या वारसा स्थळांना भेट दिली असता, तिथे झालेल्या विद्रुपीकरणाने ताे अस्वस्थ झाला. ऐतिहासिक महत्त्व असलेली ही स्थळे जतन करण्याचा संदेश लाेकांना द्यावा, असा निश्चय त्याने केला. इच्छा तेथे मार्ग म्हणतात ते खाेटे नाही. आपले दाेन्ही स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग त्याला सापडला. २० डिसेंबर राेजी त्याने आपली सायकल उचलली आणि निघाला प्रवासाला. अर्थात घरच्यांचे पाठबळ हाेतेच साेबत पण खिशात केवळ ४५०० रुपये हाेते.

औरंगाबादहून निघाल्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू (काेईंबतूर), केरळ व कन्याकुमारी गाठली. पुढे कर्नाटक, आंध्रप्रदेश हाेत तेलंगणाचा हैदराबाद व आदिलाबादमार्गे सुनील नागपूरला पाेहचला. या प्रवासात त्याने तुळजापूर, विजापूर, बदामी, पट्टडकल, हम्पी, म्हैसूर पॅलेस, केरळचा पश्चिम घाट, इद्दुकी धरण, सबरीमाला मंदिर, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुरै (मीनाक्षी मंदिर), तिरुचिराप्पल्ली, तंजूवरचा शिलालेख, कृष्णगिरी, होसूर, बेंगळुरू तसेच हैदराबादला गोलकोंडा किल्ला, चारमीनार, सालारजंग संग्रहालय, संघी मंदिर, बिर्ला मंदिराला भेट दिली. नागपुरात दाेन दिवस मुक्कामात वारसा स्थळांना भेटी देत ताे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली हाेत मनाली, लेह लद्दाख, कारगीलमार्गे काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात भ्रमण करीत पुन्हा महाराष्ट्र गाठणार आहे. अशाप्रकारे १५ राज्यातील ८० शहरांच्या भारतीय व जागतिक वारसा स्थळांना ताे भेटी देत ११ हजार किलाेमीटरचा प्रवास करणार आहे. असा हा १२० दिवसांचा प्रवास असून पुढल्या ५० दिवसात त्याला ६१५० किलाेमीटरचे अंतर पादाक्रांत करायचे आहे.

माझी ही सायकल राईड भारतीय सैनिकांना व पाेलिसांना समर्पित आहे. वारसा स्थळ जतन करण्यासह आराेग्य आणि पर्यावरण हाही संदेश मला द्यायचा आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती कशी आहे, तिथले लोक कसे आहेत. याचा अभ्यास करायचा होता. ४५०० रुपये घेऊन निघालाे पण प्रवासात लाेकांनी खूप मदत केली.

- सुनील थाेरात, सायकल राईडर

त्या किर्र अंधारात मी एकटा

केरळच्या घाटावरून चालत असताना रात्र झाली हाेती आणि अचानक सायकल पंक्चर झाली. भाषांच्या अडथळ्यात पुढले सुरक्षित ठिकाण गाठायचे हाेते. त्या किर्र अंधारात मी सायकल ढकलत चालत हाेताे. अशावेळी त्या मार्गे जाणाऱ्या वन विभाग व पाेलीस कर्मचाऱ्यांनी मदत केली. हैदराबादमध्ये असाच एकाने समाेर येऊन गळा दाबला हाेता. हे काही कटू प्रसंग आहेत पण बरेच चांगले अनुभव आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतCyclingसायकलिंग