शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : जैविक खते आता बायो कॅप्सूलच्या रूपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:45 PM

दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संशोधनएक एकरासाठी एक बायो कॅप्सूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अ‍ॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अ‍ॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोममध्ये असलेल्या कृषी उद्योग विकास मंडळाच्या स्टॉलवर हे बायो कॅप्सूल शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे पिकांना जमिनीद्वारे मिळणारी मूलद्रव्ये मिळत नाही. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधुनिक नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित बायो कॅप्सूल आणले आहे.एका बायो कॅप्सूलमध्ये एक कोटी जीवाणू आहे. ते सर्व प्रकारच्या पिकांसाठी व फळांसाठी उपयुक्त आहे. यामुळे एक एकर शेतात एक बायो कॅप्सूल पुरेसे आहे. या कॅप्सूलमुळे जमिनीची पोत सुधारते, पिकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पादनाचा खर्च कमी होतो. जमिनीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढून पोत सुधारते. बायो कॅप्सूल वापरामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जैविक असल्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. मुळांची वाढ होऊ कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये योग्य प्रमाणात शोषली जातात.सहा कॅप्सूलची एक स्ट्रीप ३५० रुपयाला उपलब्ध आहे. कृषी उद्योग महामंडळाचे रुपेश दिगळे, भागवत सोमवन आणि जयश्री पाटील हे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर