शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; विदेशी तज्ज्ञांनी सांगितल्या संत्रा उत्पादनाच्या पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:44 IST

नागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपुरात सुरू असलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी देशविदेशच्या तज्ज्ञांनी संत्रा उत्पादनाच्या विविध पद्धती शेतकऱ्यांसमोर विशद केल्या. यात श्रीलंका व कंबोडियातील प्रतिनिधी उपस्थित होते.

संत्रा उत्पादनात भारत आघाडीवर : विथानागे डॉन लेसलीसंत्री व अन्य लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर औषधी गुण आहेत. त्यामुळे या फळांचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. परंतु, ही फळे गुणवत्तापूर्णही असायला पाहिजे. या क्षेत्रात भारत बराच पुढे आहे, असे मत श्रीलंकेच्या कृषी विभागाचे प्रधान शास्त्रज्ञ विथानागे डॉन लेसली यांनी वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.भारतामध्ये संत्र्याचे उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान प्रगत आहे. विदर्भातील संत्रा शेती पाहिल्यानंतर याचा अनुभव येतो. श्रीलंकेत अशीच संत्रा शेती करण्याचे स्वप्न आहे. वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमधून मिळालेल्या अनुभवाचा श्रीलंकेला फायदा होईल. असे महोत्सव नियमित आयोजित केल्यास शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन मिळू शकते. शेतकऱ्यांना केवळ दिशा दाखविण्याची आवश्यकता असते. त्यानंतर ते आपोआप पुढे जातात. एवढेच नाही तर, हे महोत्सव प्रगत शेतकऱ्यांना त्यांचे कौशल्य जगापुढे आणण्याचे व्यासपीठ मिळवून देते. संशोधकांनाही त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळते. दोन्ही बाजूने ज्ञानाची आदानप्रदान होते असे लेसली यांनी पुढे बोलताना सांगितले.७० टक्के संत्रा उत्पादन घरीच होते : अरुनाथिलाकेश्रीलंका येथे ७० टक्के उत्पादन घर उद्यानात तर, केवळ ३० टक्के संत्रा उत्पादन शेतीमध्ये होते. त्यामुळे संत्र्याची मागणी पूर्ण होत नाही. संत्रा उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागणार आहे असे श्रीलंकेतील कृषी विभागाचे संशोधक गमाराल्लागे निशांथा अरुनाथिलाके यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्याचा उपयोग श्रीलंकेत केला जाऊ शकतो. श्रीलंका येथील वातावरण संत्रा पिकासाठी योग्य नाही. त्यामुळे हे फळ श्रीलंकेचे मुख्य पीक होऊ शकले नाही. परंतु, महाराष्ट्रातून आयात करण्यात येणाऱ्या संत्र्यांनी श्रीलंकन नागरिकांची मने जिंकली आहेत. श्रीलंका मुख्यत: भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व अफगाणिस्तान येथून संत्री आयात करतो. नागपूरमध्ये पूर्ण शेतीमध्ये संत्र्याचे पीक घेतले जाते. त्यासोबत इतर पिके घेतली जात नाही. श्रीलंका येथे असे होणे गरजेचे आहे. सध्या येथे काही भागात संत्रा व काही भागात दुसरे पीक घेतले जाते. हे चित्र बदलणे आवश्यक आहे.कम्बोडियामध्ये संत्रा संशोधनाची गरज : काँग वॉचिजमकम्बोडियातील आंबा निर्यात होतो. परंतु, संत्र्याचे उत्पादन केवळ कम्बोडियातील मागणीपुरते मर्यादित आहे. त्यामुळे कम्बोडियामध्ये संत्र्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे मत कम्बोडिया येथील कृषी-उद्योग विभागाच्या प्रक्रिया व्यवस्थापन शाखेचे वरिष्ठ अधिकारी काँग वॉचिजम यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्याच्या अनेक जाती पहायला मिळाल्या. या जाती मौल्यवान आहेत. भारतात संत्रा पिकावर होत असलेले संशोधन प्रशंसनीय आहे. कम्बोडियामध्ये अशाच संशोधनाची आवश्यकता आहे. सध्या कम्बोडियामध्ये उत्पादित होणारी संत्री ९० टक्के गोड आहेत. कम्बोडियामध्ये चीन व थायलंडमधून संत्री आयात केली जातात. कम्बोडियन नागरिक केवळ संत्री खातात किंवा संत्र्याचा रस काढून पितात. इतर प्रक्रिया केलेली उत्पादने वापरत नाहीत. कम्बोडिया येथे पुओसाट व बट्टामबंग या दोन जातीच्या संत्र्यांसह कोह ट्रोन्ग पोमेलो व लिंबू या दोन लिंबूवर्गीय फळांचेही उत्पादन होते. असे वॉचिजम यांनी सांगितले.कम्बोडियामध्ये वर्षभरात एकच पीक होते : फान हॉरकम्बोडिया येथे उन्हाळा व पावसाळा हे दोनच ऋतू आहेत. त्यामुळे वर्षभरात संत्र्याचे एकच पीक घेता येते, अशी माहिती कम्बोडिया येथील कृषी-उद्योग विभागाच्या प्रक्रिया व्यवस्थापन शाखेचे उपमुख्य अधिकारी फान हॉर यांनी वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये ‘लोकमत’शी बोलताना दिली. कम्बोडिया येथे पुओसाट व बट्टामबंग या दोन जातीच्या संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कम्बोडियामध्ये संत्रा उत्पादन वाढणे गरजेचे आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारची संत्री पहायला मिळाली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. कम्बोडियामध्ये परत गेल्यानंतर येथील अनुभव संत्रा उत्पादकांशी वाटेल. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल हा विश्वास आहे. कम्बोडियामध्ये संत्रा संशोधनासाठी बराच वाव आहे. अजूनही बरेच पुढे जायचे आहे. हा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल शेतकऱ्यांसाठी उपयोगी सिद्ध झाला आहे. असे फेस्टिव्हल नियमित झाले पाहिजे. कम्बोडिया सरकार शेतीमध्ये कंत्राट पद्धतीचा अवलंब करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्र्यासह कोणतेही पीक घेतल्यास त्याला बाजारपेठ व चांगली किंमत उपलब्ध होते असे हॉर यांनी सांगितले.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल