शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मानसिक आरोग्य दिन; मोबाईल बंद असतानाही मोठमोठ्याने बोलणे हा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 07:30 IST

Nagpur News १० ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

ठळक मुद्दे१०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना आजार‘बायपोलर मूड डिसॉडर’

सुमेध वाघमारे

नागपूर : अतिउत्साहीपणा दाखवित काही जण मोबाईल बंद असतानाही मोबाईलवर मोठमोठ्याने बोलून स्वत:ला वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात. तर, काही उघडपणे चारचौघांत मोठ्यामोठ्या गोष्टी करतात. काही जण दिलदारीपणा दाखवत वारेमाप पैसा उधळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणतात. प्रत्येक १०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना हा आजार असू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली. (World Mental Health Day)

९ ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

-या आजाराला वयाची मर्यादा नाही-डॉ. शर्मा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कनक गिल्लूरकर-शर्मा म्हणाल्या की, काही जणांना इतरांच्या तुलनेत मी कसा वेगळा आहे, मला कसे अधिकार प्राप्त आहेत, मी कसा दिलदार आहे हे दाखविण्याची सवय असते. ‘कार्पोरेट क्षेत्रात’ अशा व्यक्ती आपल्यापेक्षा उच्चपदस्थांना खूष करण्यासाठी वारेमाप खर्च करतात. वास्तविक याची काहीही आवश्यकता नसते. प्रत्यक्षात मेंदूतल्या रासायनिक घटकांचे असंतुलन झाले तर अशा गोष्टी घडत असतात. या उलट अचानक काही लोक छोट्याशा गोष्टींवर अचानक उदासीन होऊन जातात. याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणातात. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. अशा आजाराच्या रुग्णांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

-मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध - डॉ. ठाकरे 

मेडिकलच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे डॉ. मनीष ठाकरे म्हणाले की, मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध येत असल्याने व्यक्ती अतिभावूक झाला तर त्याच्या मेंदूतल्या रसायनांवर ताण पडतो. चिंता, राग, द्वेष, इर्शा, भय, अतिउत्साह, काळजी या मानवी स्वभावांचा व्यक्तीच्या मेंदूतील रयासनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे रसायनांचे संतुलन बिघडून व्यक्ती नैराश्यात लोटली जाण्याची शक्यता असते. मानसिक आजारावरील औषधे ही मेंदूतल्या रसायनांचे संतुलन राखण्यास मदत करतात. तर समुपदेशन हे व्यक्तीच्या स्वभावावर परिवर्तनासाठी आवश्यक ठरते, असेही ते म्हणाले.

-नैराश्याचे प्रमाण वाढत आहे-डॉ. गावंडे 

मानसोपचारतज्ज्ञ व सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे म्हणाले की, कोरोनापूर्वी नैराश्याचे प्रमाण जवळपास १५ टक्के होते, कोरोनामुळे ते वाढून २० ते २५ टक्क्यांवर गेले आहे. या मागे कोरोनामुळे बंद झालेले व्यवसाय, बेरोजगारी, घरात झालेले मृत्यू, आजारपणामुळे शरीराला आलेले व्यंगत्व, उपचारात खर्च झालेला पैसा अशी अनेक कारणे आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला अशा कुटुंबामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. अशा १०० कुटुंबांमध्ये १२ ते १४ कुटुंबांत मानसिक आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य