शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जागतिक मानसिक आरोग्य दिन; मोबाईल बंद असतानाही मोठमोठ्याने बोलणे हा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 07:30 IST

Nagpur News १० ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

ठळक मुद्दे१०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना आजार‘बायपोलर मूड डिसॉडर’

सुमेध वाघमारे

नागपूर : अतिउत्साहीपणा दाखवित काही जण मोबाईल बंद असतानाही मोबाईलवर मोठमोठ्याने बोलून स्वत:ला वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात. तर, काही उघडपणे चारचौघांत मोठ्यामोठ्या गोष्टी करतात. काही जण दिलदारीपणा दाखवत वारेमाप पैसा उधळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणतात. प्रत्येक १०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना हा आजार असू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली. (World Mental Health Day)

९ ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

-या आजाराला वयाची मर्यादा नाही-डॉ. शर्मा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कनक गिल्लूरकर-शर्मा म्हणाल्या की, काही जणांना इतरांच्या तुलनेत मी कसा वेगळा आहे, मला कसे अधिकार प्राप्त आहेत, मी कसा दिलदार आहे हे दाखविण्याची सवय असते. ‘कार्पोरेट क्षेत्रात’ अशा व्यक्ती आपल्यापेक्षा उच्चपदस्थांना खूष करण्यासाठी वारेमाप खर्च करतात. वास्तविक याची काहीही आवश्यकता नसते. प्रत्यक्षात मेंदूतल्या रासायनिक घटकांचे असंतुलन झाले तर अशा गोष्टी घडत असतात. या उलट अचानक काही लोक छोट्याशा गोष्टींवर अचानक उदासीन होऊन जातात. याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणातात. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. अशा आजाराच्या रुग्णांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

-मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध - डॉ. ठाकरे 

मेडिकलच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे डॉ. मनीष ठाकरे म्हणाले की, मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध येत असल्याने व्यक्ती अतिभावूक झाला तर त्याच्या मेंदूतल्या रसायनांवर ताण पडतो. चिंता, राग, द्वेष, इर्शा, भय, अतिउत्साह, काळजी या मानवी स्वभावांचा व्यक्तीच्या मेंदूतील रयासनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे रसायनांचे संतुलन बिघडून व्यक्ती नैराश्यात लोटली जाण्याची शक्यता असते. मानसिक आजारावरील औषधे ही मेंदूतल्या रसायनांचे संतुलन राखण्यास मदत करतात. तर समुपदेशन हे व्यक्तीच्या स्वभावावर परिवर्तनासाठी आवश्यक ठरते, असेही ते म्हणाले.

-नैराश्याचे प्रमाण वाढत आहे-डॉ. गावंडे 

मानसोपचारतज्ज्ञ व सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे म्हणाले की, कोरोनापूर्वी नैराश्याचे प्रमाण जवळपास १५ टक्के होते, कोरोनामुळे ते वाढून २० ते २५ टक्क्यांवर गेले आहे. या मागे कोरोनामुळे बंद झालेले व्यवसाय, बेरोजगारी, घरात झालेले मृत्यू, आजारपणामुळे शरीराला आलेले व्यंगत्व, उपचारात खर्च झालेला पैसा अशी अनेक कारणे आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला अशा कुटुंबामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. अशा १०० कुटुंबांमध्ये १२ ते १४ कुटुंबांत मानसिक आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य