शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जागतिक मानसिक आरोग्य दिन; मोबाईल बंद असतानाही मोठमोठ्याने बोलणे हा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 07:30 IST

Nagpur News १० ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

ठळक मुद्दे१०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना आजार‘बायपोलर मूड डिसॉडर’

सुमेध वाघमारे

नागपूर : अतिउत्साहीपणा दाखवित काही जण मोबाईल बंद असतानाही मोबाईलवर मोठमोठ्याने बोलून स्वत:ला वेगळे दाखविण्याचा प्रयत्न करतात. तर, काही उघडपणे चारचौघांत मोठ्यामोठ्या गोष्टी करतात. काही जण दिलदारीपणा दाखवत वारेमाप पैसा उधळतात. वैद्यकीय भाषेत याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणतात. प्रत्येक १०० व्यक्तींमध्ये साधारण दोघांना हा आजार असू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञांनी दिली. (World Mental Health Day)

९ ऑक्टोबर हा दिवस मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील मानसोपचारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलून मानसिक आजारावर प्रकाश टाकला.

-या आजाराला वयाची मर्यादा नाही-डॉ. शर्मा

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कनक गिल्लूरकर-शर्मा म्हणाल्या की, काही जणांना इतरांच्या तुलनेत मी कसा वेगळा आहे, मला कसे अधिकार प्राप्त आहेत, मी कसा दिलदार आहे हे दाखविण्याची सवय असते. ‘कार्पोरेट क्षेत्रात’ अशा व्यक्ती आपल्यापेक्षा उच्चपदस्थांना खूष करण्यासाठी वारेमाप खर्च करतात. वास्तविक याची काहीही आवश्यकता नसते. प्रत्यक्षात मेंदूतल्या रासायनिक घटकांचे असंतुलन झाले तर अशा गोष्टी घडत असतात. या उलट अचानक काही लोक छोट्याशा गोष्टींवर अचानक उदासीन होऊन जातात. याला ‘बायपोलर मूड डिसॉडर’ म्हणातात. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. अशा आजाराच्या रुग्णांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

-मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध - डॉ. ठाकरे 

मेडिकलच्या मनोविकृती शास्त्र विभागाचे डॉ. मनीष ठाकरे म्हणाले की, मेंदू आणि भावना यांचा परस्पर संबंध येत असल्याने व्यक्ती अतिभावूक झाला तर त्याच्या मेंदूतल्या रसायनांवर ताण पडतो. चिंता, राग, द्वेष, इर्शा, भय, अतिउत्साह, काळजी या मानवी स्वभावांचा व्यक्तीच्या मेंदूतील रयासनांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. त्यामुळे रसायनांचे संतुलन बिघडून व्यक्ती नैराश्यात लोटली जाण्याची शक्यता असते. मानसिक आजारावरील औषधे ही मेंदूतल्या रसायनांचे संतुलन राखण्यास मदत करतात. तर समुपदेशन हे व्यक्तीच्या स्वभावावर परिवर्तनासाठी आवश्यक ठरते, असेही ते म्हणाले.

-नैराश्याचे प्रमाण वाढत आहे-डॉ. गावंडे 

मानसोपचारतज्ज्ञ व सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे म्हणाले की, कोरोनापूर्वी नैराश्याचे प्रमाण जवळपास १५ टक्के होते, कोरोनामुळे ते वाढून २० ते २५ टक्क्यांवर गेले आहे. या मागे कोरोनामुळे बंद झालेले व्यवसाय, बेरोजगारी, घरात झालेले मृत्यू, आजारपणामुळे शरीराला आलेले व्यंगत्व, उपचारात खर्च झालेला पैसा अशी अनेक कारणे आहेत. विशेष म्हणजे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला अशा कुटुंबामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. अशा १०० कुटुंबांमध्ये १२ ते १४ कुटुंबांत मानसिक आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य