शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

संवाद हरविलेल्या जगात नागपूरच्या तरुणांचा असाही अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 20:14 IST

समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डोळ्यावर पट्टी बांधून मनसोक्त गप्पा ठोकल्या.

ठळक मुद्देडोळ्यावर पट्टी आणि मनसोक्त गप्पा!

अंकिता देशकरआॅनलाईन लोकमतनागपूर : संवादाची माध्यमे आता काळानुरूप बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ केले तरी, आपुलकी मात्र दुरावली आहे. तंत्रज्ञानाचे कुतूहल आज वाटत असले तरी, भविष्यात त्याचे परिणामही भोगावे लागणार आहे. मुळात समाजाच्या एकोप्याचा सर्वात महत्त्वाचा कणा म्हणजे संवाद, हा संवादच आज मोबाईलमुळे हरविलेला आहे. तंत्रज्ञानामुळे संवादाची पडलेली दुफळी भरून काढण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव उपक्रम शंकरनगरातील उद्यानामध्ये राबविला होता. यात सहभागी झालेल्या अनोळखींनी डोळ्यावर पट्टी बांधून मनसोक्त गप्पा ठोकल्या.आजच्या युगात आपल्याला हातातील मोबाईलपासून क्वचितच वेळ मिळतो. मोबाईलवर तासन्तास बोलणारे आपण, मुळात एकमेकांच्या समोर आलोत तर दातओठ खातो. या आणि अशाच अनेक गोष्टी लक्षात घेत नागपूरमधील काही तरुण एकत्र आलेत आणि गुडविल ट्राईब या नावाखाली एक अनोखा उपक्र म वर्षाच्या पहिल्या रविवारी, शंकरनगरच्या उद्यानामध्ये घेतला. उद्यानाच्या दारावरच सहभागी झालेल्या लोकांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली. त्यांना त्यांच्या अनोळखी सहयोगीजवळ नेऊन बसविण्यात आले. यात एक अट होती, अर्ध्या तासाचे हे संभाषण संपेपर्यंत एकमेकांना आपले नाव सांगायचे नाही आणि मनसोक्त गप्पा मारायच्या.या कार्यक्र माकरिता फेसबुकच्या माध्यमातून आॅनलाईन प्रवेशप्रक्रि या घेण्यात आली. अशा पहिल्या-वाहिल्या उपक्र माला खूप गर्दी नको म्हणून विविध वयोगटातील फक्त ६० लोक निवडण्यात आले. डोळ्यावर पट्टी असूनदेखील सहभागी झालेल्यांनी गप्पा मारल्या आणि शेवटी गर्दीमध्ये आपण कोणासोबत बोललो असावे याचादेखील विचार केला.शेवटी प्रत्येकाला एक त्याच्या सहयोग्याचा पत्ता असलेले पोस्टकार्ड देण्यात आले. आपण ज्यांच्यासोबत बोललो त्याला न पाहता, त्याच्याबद्दल काय वाटले हे त्या पोस्टकार्डवर लिहायला सांगितले. या कार्यक्र माचे वैशिष्ट्य म्हणजे गप्पा मारताना संपूर्ण वेळ कुणीही आपल्या खिशातील मोबाईल काढले नाही.

टॅग्स :nagpurनागपूर