शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जागतिक कुटुंब दिन : अख्या कुटुंबानेच केलाय अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:58 IST

काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सामाजिक जाणिवा जोपासणारे नागपुरातील मेश्राम कुटुंबाने अवयव दानाचे मानवतावादी ध्येय स्वीकारले आहे. अख्या कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला असून ७५ वर्षाच्या आजोबांपासून दोन वर्षाच्या नातवापर्यंत कुटुंबातील २८ सदस्यांनी अवयवदानाचे संकल्पपत्र भरून घेतले. या कुटुंबाने इतरांनाही प्रोत्साहित करण्याचा विडा उचलला आहे.

ठळक मुद्देदोन वर्षापासून तर ७५ वर्षांपर्यंतच्या २८ जणांना समावेश : इतरांनाही करताहेत प्रोत्साहित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही कुटुंब एखाद्या व्यवसायाला समर्पित असतात, काही क्रीडा क्षेत्राला, नाट्य क्षेत्राला किंवा सिनेमा क्षेत्राला वाहून घेतलेले कुटुंब आपल्या पाहण्यात येतात. काहींनी सामाजिक संवेदना जपत समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेच्या ध्येयाला वाहून घेतले आहे. याच सामाजिक जाणिवा जोपासणारे नागपुरातील मेश्राम कुटुंबाने अवयव दानाचे मानवतावादी ध्येय स्वीकारले आहे. अख्या कुटुंबाने अवयवदानाचा संकल्प केला असून ७५ वर्षाच्या आजोबांपासून दोन वर्षाच्या नातवापर्यंत कुटुंबातील २८ सदस्यांनी अवयवदानाचे संकल्पपत्र भरून घेतले. या कुटुंबाने इतरांनाही प्रोत्साहित करण्याचा विडा उचलला आहे.प्रा. सुशील मेश्राम हे या कुटुंबातीलच एक प्रमुख सदस्य. त्यांच्या पुढाकारामुळेच संपूर्ण मेश्राम कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. प्रा. सुशील मेश्राम हे सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयात मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी अवयवदानाचा संकल्प केला. यासाठी आपल्या कुटुंबीयांनाही तयार केले. त्यांचे वडील गंगाराम मेश्राम, त्यांचे दोन भाऊ चंदू मेश्राम व गोपाल मेश्राम त्यांच्या पत्नी, मुले, नातवंड असे २८ जणांचे त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. सर्वात लहान कुशल विशाल मेश्राम आहे. या सर्वांनीच मिळून अवयवदानाचा संकल्प केला असून रीतसर संकल्प पत्रही भरून घेतले आहे.प्रा. सुशील यांनी केवळ भावनेच्या भरात येऊन अवयवदानाचा संकल्प केलेला नाही. तर याचा बारीक अभ्यास केला. त्यानंतर देहदान, नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी काम करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत तीन हजारावर नागरिकांना प्रेरित करून त्यांच्याकडून देहदान संकल्प फार्म भरून घेतले आहेत, इतकेच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही यासाठी प्रेरित केले आहे. अशा दीड हजारावर विद्यार्थिनींनी संकल्प पत्र भरलेले आहेत.लोकमतमुळेच मिळाली प्रेरणाप्रा. सुशील मेश्राम यांनी सांगितले, ५ ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस आहे. २०१५ साली लोकमतने या दिवशी एक विशेष पान प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी लोकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून अवयवदान करण्याचे आवाहन केले होते. आपण त्या वृत्ताने खूप प्रेरित झालो आणि अवयवदानाचा संकल्प केला. परंतु त्यानंतर माझ्या महाविद्यालयाने माझा सन्मान केला. समाजाकडून मला जे प्रोत्साहन मिळाले, त्यामुळे मला नवी दृष्टी मिळाली. अवयवदान, नेत्रदान आणि देहदानाच्या चळवळीत मी स्वत:ला झोकून दिले. अनेक प्रतिष्ठित लोकांकडूनही मी देहदान व नेत्रदानासह अवयवदानाचा संकल्प करून घेतला आहे.मानवता, बंधुता आणि समतेची शिकवणहीरक्तदान, अवयवदान, देहदान व नेत्रदान ही चळवळ केवळ दानासाठी प्रोत्साहन करण्यापूर्ती मर्यादित नाही, तर ही तथागत गौतम बुद्धांची मानवतेची शिकवण आहे. या चळवळीच्या माध्यमातून संविधानाला प्रेरित असलेली बंधुता व समता समाजात प्रस्थापित करण्याचाही एक प्रयत्न असल्याचे प्रा. सुशील मेश्राम यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :FamilyपरिवारOrgan donationअवयव दान