शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जागतिक मधुमेह दिन; सत्तरीच्या आधीच मृत्यूचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 07:00 IST

Nagpur News आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाचा अहवालमधुमेहाची गुंतागुंत रोखण्यासाठी निदान व उपचार आवश्यक

नागपूर : मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. चीननंतर भारत मधुमेहाची राजधानी ठरू पाहत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात. २०१६मध्ये मृत्यूच्या कारणांपैकी मधुमेह हे सातवे प्रमुख कारण होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

जगभरात सध्या ४२ कोटी ५० लाखांहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. वय ४५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल, मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा वजन जास्त असेल तर तुम्हाला ‘टाईप-२’ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहाची गुंतागुंत रोखणे व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकर निदान व उपचार हीच गुरुकिल्ली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- मधुमेहावर आहाराचे व्यवस्थापन गरजेचे

मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, मधुमेहग्रस्तांनी सक्रिय जीवनशैली आत्मसात करावी. यामुळे कॅलरी जळण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याशिवाय, आहारात संपूर्ण धान्य, कडधान्ये व भाज्यांंचा समावेश करायला हवा. हंगामी फळांना प्राधान्य द्यायला हवे. विशेष म्हणजे, प्रतिबंधात्मक आहार असू नये, कारण आहाराचे व्यवस्थापन अयशस्वी होण्यामागे हे सर्वात मोठे कारण ठरते.

- नियमित व्यायामामुळे चयापचय सुधारते

नियमित व्यायामामुळे शरिरातील चयापचय सुधारते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. व्यायाम चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते. तज्ज्ञांनी दर आठवड्याला १५० मिनिटं व्यायामाची शिफारस केली आहे, असेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.

- मानसिक आरोग्य सांभाळा

तणाव, चिंता आणि नैराश्य यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे थेट हार्मोनल चक्रात अडथळा आणतात. ज्यामुळे अनेक आजार होतात. त्याचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरही नकारात्मक परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संयम, समर्पण या सर्व गोष्टी आवश्यक ठरतात.

- औषधांशिवाय साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य 

‘टाईप २’ मधुमेहावर रामबाण उपचार नाही. परंतु, एका अभ्यासावरून काही लोकांना ते उलट करणे शक्य आहे. आहारात बदल केल्यास, वजन कमी केल्यास व नियमित व्यायामाने औषधांशिवाय रक्तातील साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य आहे. आहार संतुलित असल्यास ग्लुकोजची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

 डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ

 २०३० पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण 

भारतात मधुमेहाचे प्रमाण गतीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०३०पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण दिसून येण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणामुळे कमी वयामध्ये ‘टाईप २’ मधुमेह आढळून येत आहे. हे चिंताजनक आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंड व मज्जासंस्थेवर (नर्व्ह) परिणाम होतो. हृदयविकार, पक्षाघात आणि पायाचा रक्तपुरवठा कमी होऊन अनेक गुंतागुंत निर्माण होते. या सर्वांना दूर ठेवण्यासाठी मधुमेहाला प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

- डॉ. परिमल तायडे, मधुमेह तज्ज्ञ व एन्डोक्रायनोलॉजिस्ट

टॅग्स :Healthआरोग्य