शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जागतिक मधुमेह दिन; सत्तरीच्या आधीच मृत्यूचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 07:00 IST

Nagpur News आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाचा अहवालमधुमेहाची गुंतागुंत रोखण्यासाठी निदान व उपचार आवश्यक

नागपूर : मधुमेहाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. चीननंतर भारत मधुमेहाची राजधानी ठरू पाहत आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या माहितीनुसार, रक्तातील वाढलेल्या ग्लुकोजमुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ निम्मे मृत्यू हे वयाच्या ७० वर्षांच्या आधी ओढवतात. २०१६मध्ये मृत्यूच्या कारणांपैकी मधुमेह हे सातवे प्रमुख कारण होते, असेही या अहवालात म्हटले आहे.

जगभरात सध्या ४२ कोटी ५० लाखांहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. वय ४५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल, मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असेल किंवा वजन जास्त असेल तर तुम्हाला ‘टाईप-२’ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहाची गुंतागुंत रोखणे व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकर निदान व उपचार हीच गुरुकिल्ली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- मधुमेहावर आहाराचे व्यवस्थापन गरजेचे

मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर म्हणाले, मधुमेहग्रस्तांनी सक्रिय जीवनशैली आत्मसात करावी. यामुळे कॅलरी जळण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. याशिवाय, आहारात संपूर्ण धान्य, कडधान्ये व भाज्यांंचा समावेश करायला हवा. हंगामी फळांना प्राधान्य द्यायला हवे. विशेष म्हणजे, प्रतिबंधात्मक आहार असू नये, कारण आहाराचे व्यवस्थापन अयशस्वी होण्यामागे हे सर्वात मोठे कारण ठरते.

- नियमित व्यायामामुळे चयापचय सुधारते

नियमित व्यायामामुळे शरिरातील चयापचय सुधारते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. व्यायाम चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला गती देते. तज्ज्ञांनी दर आठवड्याला १५० मिनिटं व्यायामाची शिफारस केली आहे, असेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.

- मानसिक आरोग्य सांभाळा

तणाव, चिंता आणि नैराश्य यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे थेट हार्मोनल चक्रात अडथळा आणतात. ज्यामुळे अनेक आजार होतात. त्याचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवरही नकारात्मक परिणाम होतो. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संयम, समर्पण या सर्व गोष्टी आवश्यक ठरतात.

- औषधांशिवाय साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य 

‘टाईप २’ मधुमेहावर रामबाण उपचार नाही. परंतु, एका अभ्यासावरून काही लोकांना ते उलट करणे शक्य आहे. आहारात बदल केल्यास, वजन कमी केल्यास व नियमित व्यायामाने औषधांशिवाय रक्तातील साखरेची सामान्य पातळी गाठणे शक्य आहे. आहार संतुलित असल्यास ग्लुकोजची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

 डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ

 २०३० पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण 

भारतात मधुमेहाचे प्रमाण गतीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०३०पर्यंत भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण दिसून येण्याची शक्यता आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणामुळे कमी वयामध्ये ‘टाईप २’ मधुमेह आढळून येत आहे. हे चिंताजनक आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंड व मज्जासंस्थेवर (नर्व्ह) परिणाम होतो. हृदयविकार, पक्षाघात आणि पायाचा रक्तपुरवठा कमी होऊन अनेक गुंतागुंत निर्माण होते. या सर्वांना दूर ठेवण्यासाठी मधुमेहाला प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

- डॉ. परिमल तायडे, मधुमेह तज्ज्ञ व एन्डोक्रायनोलॉजिस्ट

टॅग्स :Healthआरोग्य