शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जागतिक मेंदू दिन : गावखेड्यांमध्ये वाढतोय पार्किन्सनचा आजार : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 21:20 IST

पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदहा वर्षाने आजार दुपटीने वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. धक्कादायक म्हणजे, हा आजार गावातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीतर्फे २२ जुलै हा दिवस वार्षिक जागतिक मेंदू दिवस म्हणून पाळला जातो. या वर्षी हा दिवस पार्किन्सन आजाराची जनजागृती व रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. या कार्यात १२६ हून अधिक जागतिक संघटना सहभागी आहेत.डॉ. मेश्राम म्हणाले, पार्किन्सन हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव पाडतो. पार्किन्सन ही जागतिक समस्या आहे. जागतिक मेंदू दिनाचे अध्यक्ष प्राध्यापक टिसा विजरतने यांनी स्पष्ट केले की, ‘पार्किन्सन’ने जगभरातील सात दशलक्षाहूनही अधिक लोकांना प्रभावित केले आहे. यामुळे आजाराची जनजागृती होणे व रुग्णांना उपचाराखाली आणणे आवश्यक आहे.२५ टक्के रुग्णांचे चुकीचे निदानडब्ल्यूएफएनचे सरचिटणीस प्रा. वोल्फगँग ग्रिसोल्ड म्हणाले, पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखू येत नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. डब्ल्यूएफएनचे अध्यक्ष प्रा. विल्यम कॅरोल म्हणाले, मेंदूचे आरोग्य यापूर्वी कधीही इतके महत्त्वाचे नव्हते जेवढे आज आहे. प्रा. कॅरोल म्हणाले, पार्किन्सन रोगावर एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.पार्किन्सनची लक्षणेपार्किन्सन आजाराची विशिष्ट लक्षणे म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. याशिवाय झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येणे, पोटाचे विकार, बद्धकोष्ठपणा, चिंता आणि नैराश्य. या लक्षणांमुळे जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार केल्यास रुग्णांना आराम मिळतो. जीवनमान चांगले होते.उपचाराच्या पर्यायांवर चर्चानागपूर न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, मानसोपचार संस्था, नागपूर आणि सप्तक संघटनेच्यावतीने ६ ते ७. ३० दरम्यान डॉ. मेश्राम, डॉ. ध्रुव बत्रा, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचाराच्या पर्यायांवर चर्चा करतील. आहार सल्लागार जयश्री पेंढारकर या रुग्णांना योग्य आहाराबद्दल सल्ला देतील आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल मुंदडा व्यायामाचे महत्त्व विशद करतील. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. लोकेंद्रसिंह, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. नितीन चांडक हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य