शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

जागतिक दमा दिन : धुळीमुळे ६० टक्के दम्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:14 IST

जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत, तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाºया विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. विशेषत: ५ ते ११ वयोगटातील १० ते १५ टक्के मुले या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे धक्कादायक चित्र असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रदूषण, वातावरणातील बदल ठरतेय कारणीभूत : लहान मुलांभोवती वाढतोय विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत, तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाºया विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. विशेषत: ५ ते ११ वयोगटातील १० ते १५ टक्के मुले या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे धक्कादायक चित्र असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.दमा आजाराविषयी माहिती देताना वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट म्हणाले, दम्यासाठी धोकादायक घटक म्हणजे, घरातील गादी, कार्पेटवरील धूळ, घरातील पाळीव प्राण्यांचे केस, बाहेर परिसरातील धूळ, रासायनिक धूर यामुळे दम्यात वाढ झाली आहे. सोबतच वातावरणातील सतत होत असलेला बदलही या आजाराला कारणीभूत ठरत आहे.मृत्यूचे प्रमाण पाच ते सात टक्के -डॉ. अरबटडॉ. अरबट म्हणाले, ज्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजुक असते ते धूळ आणि धूरच्या संपर्कात येताच त्यांची श्वसननलिका आकुंचन पावते. श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार घेतल्यास सामान्य जीवन जगता येते. परंतु दुर्लक्ष केल्यास हाच आजार गंभीर होऊ शकतो. दम्याच्या मृत्यूचे प्रमाण पाच ते सात टक्के आहे.अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास ‘सीओपीडी’ची भीती -डॉ. मेश्राममेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, ‘सीओपीडी’ व ‘अस्थामा’च्या रुग्णांची काही लक्षणे सारखीच असतात. यामुळे रुग्णांची योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक ठरते. हे दोन्ही आजार असलेल्या ‘अ‍ॅकॉस’चे रुग्ण वाढत आहे. विशेष म्हणजे, अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास व औषधे योग्य पद्धतीने न घेतल्यास पुढे ‘सीओपीडी’ होण्याची शक्यता असते. अस्थमावर योग्य औषधोपचार केल्यास तो बरा होऊ शकतो, परंतु सीओपीडी बरा होत नाही त्याला नियंत्रणात ठेवता येते.दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’-डॉ. मिश्राइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’चा उपयोग केला जातो. आता यात ‘स्पायरोमीटर’ही आले आहे. ‘पीक फ्लो रेट’ कमी आल्यास ‘लंग फंक्शन टेस्ट’ केली जाते. त्यानंतर आवश्यक औषधोपचार केला जातो. ज्या रुग्णाला दमा आहे त्यांना घरी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’चा वापर करून दम्याचे ‘मॉनेटरींग’ करता येते. दमा वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे डोजही वाढवितात येतात. यामुळे अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका कमी होतो.दम्यासाठी धोकादायक घटक

  •  घरातील गादी, कार्पेट व इतर धूळ, मांजराचे केस, झुरळ व इतर किडे
  •  घराबाहेरील परागकण
  •  तंबाखूचा धूर, रासायनिक धूर
  •  नाक, घसा व फुफ्फुसातील जंतुसंसर्ग
  • वारंवार होणारी सर्दी
  •  भावनिक उद्वेग, शारीरिक परिश्रम
  •  आधुनिक शहरीकरण.

 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय