शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:52 IST

वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले.

ठळक मुद्देव्हेंडर काम बंद करण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. शहरातील कामकाज एक तासभर बंद ठेवले. दुसरीकडे कंपनीच्या ठेकेदारांनीही गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शहराला विजेच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एसएनडीएलने आपली ढासळती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता १२ ऑगस्टला महावितरणला पत्र लिहून कामकाज सुरू ठेवण्यास असमर्थता व्यक्त केली होती. तेव्हापासून कंपनीचे व्हेंडर (ठेकेदार) आणि कर्मचारी अस्वस्थ आहेत. मागील दोन वर्षांपासून पीएलआय (इन्सेन्टिव्ह), वेतनवाढ आणि थकीत रक्कम देण्याची मागणीही कामगारांकडून होत आहे.दरम्यान, बँकांनी अकाऊंट सीज केले असून, महावितरणसोबत तोडग्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून पैसे मिळाल्यावरच कर्मचाºयांना रक्कम दिली जाईल, असे एसएनडीएल कंपनी चालविणाऱ्या एस्सेल युटीलिटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांनी सांगितले. यामुळे कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी तासभर काम बंद ठेवले. त्यानंतर सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. कंपनीचे बिझिनेस हेड सोनल खुराणा यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र कर्मचारी काहीही एकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यांनी सोबत आणलेले कुलूप कार्यालयाला ठोकले. या घडामोडीपूर्वी कंपनीच्या व्हेंडरांनीही कार्यालयात येऊन थकीत रकमेच्या मागणीसाठी खुराणा यांना घेराव घातला होता. निघताना त्यांनी गुरुवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला.आपल्या व्यवस्थापनासह ऊर्जामंत्री आणि महावितरणच्या मुख्य अभियंत्याकडे कर्मचाऱ्यांनी न्याय मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र कुणीच मनावर घेतले नाही. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.कॉल सेंटर बंद, काम ठप्पवीज पुरवठ्यासंदर्भातील तक्रार नोंदविण्यासाठी एसएनडीएलने सुरू केलेले कॉल सेंटर आज ठप्प होते. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात व्यत्यय आला. ग्राहकांनी तक्रार नोंदविण्यासाठी कॉल केले, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीचे अनेक कार्यालयेही आज तासभर बंद होते. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या नाहीत. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील वीज पुरवण्याची स्थिती गंभीर होऊ शकते.आंदोलन होणार तीव्रपंतप्रधान मोदी ७ सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे शहरातील वीज पुरवठा प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीला एसएनडीएल आणि एस्सेल समूहाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.घटनाक्रमावर महावितरणचे बारीक लक्षसुरू असलेल्या घडामोडीवर महावितरणचे बारीक लक्ष आहे. ७ सप्टेंबरनंतर महावितरण केव्हाही हे कामकाज हातात घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कार्यकारी अभियंत्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी घटनाक्रमाची माहिती संचालक (परिचालन) यांना दिली. शहरवासीयांना महावितरण वीज संकटात पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Employeeकर्मचारीelectricityवीजagitationआंदोलन