शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:59 PM

शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्यां सामान्यांना बसत आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसोबतच सामान्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्या सामान्यांना बसत आहे.कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात २००८ पासून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय अडकून पडले आहे. केवळ आठ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्हासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे. परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कार्यालयात पाण्याची विशेष सोय नाही. प्रसाधन गृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरातील प्रसाधन गृहाचा वापर करतात. महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्वत:ची जागा नसल्याने कार्यालयाच्या चार भिंती सोडल्यास संपूर्ण परिसरात हातठेल्यांपासून ते ‘ऑनलाईन’ केंद्राचे अतिक्रमण आहे. अतिक्रमण एवढे की जिथे अर्जदारांची रांग लागते तिथेच दलालांचे टेबलही लागतात. कार्यालयाच्या आत तर भयाण चित्र आहे. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेत डोक्यापासून चार ते पाच फुटावर असलेल्या टिनाचा शेडखाली कार्यालयाचे कामकाज चालते.डोक्याला रुमाल बांधून करावे लागते काम 

कार्यालय प्रशासनाने पंखे व कुलरची सोय केली असलीतरी त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे व ते कुचकामी ठरल्याचे येथील कर्मचारी सांगतात. डोक्याला रुमाल बांधूनच काम करावे लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सततच्या घामामुळे व उष्ण हवेमुळे आरोग्य धोक्यात आल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.चार वर्षे होऊनही बांधकाम अपूर्णचआरटीओ कार्यालयाला ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील पाच एकरची जागा मिळाली. १४ कोटींचा निधीही मंजूर झाला. २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण होणार होते. परंतु आता चार वर्षांचा कालावधी होऊनही बांधकाम पूर्ण झालेले नाही.उन्हात लागते रांग 
कार्यालयातील विविध खिडकींवर उभे राहण्यासाठी टिनाचे शेड टाकण्यात आले आहे. परंतु या शेडखाली दलालांचे टेबल लागत असल्याने कार्यालयात येणाऱ्यांना उन्हात उभे रहावे लागते तर, कर्मचाऱ्यांना तापत्या टिनाच्या शेडखाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागते.आणखी एक महिन्याचा कालावधीनागपूर ग्रामीण आरटीओचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही छोटेमोठे काम शिल्लक आहे. यामुळे नव्या इमारतीतून कार्यालयाचे कामकाज सुरू व्हायला आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.श्रीपाद वाडेकरप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर