शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य, नागपूरकर करतात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:16 IST

कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.

ठळक मुद्देजागतिक वसुंधरा दिवसप्लास्टिकबंदी, प्रक्रिया उद्योगाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.वसुंधरेच्या संवर्धनासाठी जगात ‘अर्थ डे नेटवर्क ’ ही संस्था कार्यरत आहे. २२ एप्रिल १९७० पासून संस्था ‘वसुंधरा दिवस’ साजरा करते. आज १९५ देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. यावर्षी वसुंधरा दिवसाची थीम ‘प्लास्टिकबंदी’ आहे. वसुंधरेच्या संवर्धनाच्या बाबतीत बोलत असताना ‘प्लास्टिकबंदी’ ही नागपूरसारख्या विकसनशील शहरासाठीसुद्धा लागू होते. शहरातून दररोज निघणारा १२०० टन कचऱ्यापैकी १२ ते १५ टक्के म्हणजेच १५० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा निघतो. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदी केली, कारण प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ती गरजेचीही आहे. त्याचे परिणाम मुंबईमध्ये २०१५ ला बघायलाही मिळाले आहे. नागपुरातही आज प्लास्टिकमुळे पारंपरिक जलस्रोत नष्ट होत आहे. शहरातील नाले, ड्रेनेज सिस्टिम प्लास्टिकमुळे चोक होत आहे. पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक नष्ट करण्यासाठी नागपुरात यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे फक्त प्लास्टिीक साठविले जात आहे. जो उन्हाळ्याच्या दिवसात लागलेल्या आगीमध्ये नष्ट होतो आहे. परंतु प्लास्टिक जळाल्याने जे रासायनिक घटक वातावरणात पसरत आहेत ते आजाराला निमंत्रण देणारे आहे. प्लास्टिक हे मनुष्यासाठीच नाही तर जनावरांसाठीसुद्धा धोकादायक ठरत आहे. बंदी लावली पण अंमलबजावणीचे काय?सरकारने यापूर्वीही प्लास्टिकबंदीच्या नावावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगच्या विक्रीवर बंदी घातली होती. ती अजूनही यशस्वी झाली नाही. मार्च २०१८ ला प्लास्टिकबंदीसंदर्भात निर्णय घेतला आहे. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी अनेक शासकीय संस्थांना अधिकार दिले आहे. परंतु कुठलीच संस्था प्लास्टिकबंदीला गांभीर्याने घेत नसल्याने मार्केटमध्ये सर्रास प्लास्टिकची खरेदी-विक्री सुरू आहे.डम्पिंग यार्डमध्ये वाढतोय कचराशहरातून गोळा होणारा कचरा भांडेवाडीत साठविण्यात येतो. मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हंजर या कंपनीला नियुक्त केले होते. कंपनीने येथे मोठा प्लांट टाकला. ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे टार्गेट होते. परंतु २०१२ मध्ये या प्लांटमध्ये आग लागली. तेव्हापासून हा प्लांट ठप्प पडला आहे. त्यामुळे भांडेवाडीत कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. दररोज वाढता कचरा हा शहरासाठी खरोखरच धोकादायक आहे. कचऱ्यामुळे नागपूर शहराचा ५ ते ७ किलोमीटरचा परिसर सध्या बाधित होत आहे. प्रशासनासाठी हा कचरा भविष्यात एक आव्हान ठरणार आहे. कचरा असाच वाढत गेला तर त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीसारख्या निर्णयावर परिणामकारक अंमलबजावणी व कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या बाबतीत प्रशासनाने लक्ष वेधणे गरजेचे आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर