शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘स्वच्छ भारत’चे आधारस्तंभ नागपुरात सुरक्षा साधनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:14 AM

‘स्वच्छ भारत मिशन’चे आधारस्तंभ असणारे स्वच्छता कामगार शहरात ग्लोव्हज व मास्क या सुरक्षा साधनाविना कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देग्लोव्हज, मास्क नाही विविध प्रकारच्या संसर्गाची लागण

मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ भारत मिशन’चे आधारस्तंभ असणारे स्वच्छता कामगार शहरात ग्लोव्हज व मास्क या सुरक्षा साधनाविना कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या संसर्गाची लागण झाली आहे. महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनला गालबोट लावणारा हा प्रकार आहे. त्यासाठी जबाबदार कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीला यावर जाब विचारणे आवश्यक झाले आहे.धरमपेठ झोनमध्ये कचरा गोळा करणाऱ्या एका कामगारानुसार, त्यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी ग्लोव्हज व मास्क देण्यात आले होते. त्यानंतर या सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले नाही तसेच कामगारांना स्वच्छता खर्चही दिला जात नाही. दुसऱ्या कामगाराने वेगळाच मुद्दा मांडला. कामगारांना प्रशिक्षण दिले गेले नसल्यामुळे ते ग्लोव्हज व मास्क घालून काम करू शकत नाही. कचरा गोळा करण्याचे काम आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे असतानाही कामगारांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जात नाही.अन्य एका स्वच्छता कामगाराने कचरा गोळा करताना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. नागरिक सुका व ओला कचरा वेगळा करीत नाहीत. हे काम कामगारांनाच करावे लागते. दरम्यान, त्यांचा नको त्या वस्तूंनाही स्पर्श होतो. अनेकदा काचाचे तुकडे व अन्य धारदार वस्तूंमुळे कामगारांचे हात कापले जातात. कंपनीच्या ग्लोव्हजमुळे त्यांचा बचाव होत नाही, असे त्यांनी सांगितले.

आरोप चुकीचेकनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनीने स्वच्छता कामगारांना सर्व प्रकारची सुरक्षा साधने पुरविली आहेत. ग्लोव्हज गेल्यावर्षीच देण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांचे सर्व आरोप चुकीचे आहेत.- कमलेश शर्मा, प्रकल्प प्रमुख.

काय म्हणतात डॉक्टर...डॉ. पिनाक दंदे यांनी स्वच्छता कामगारांना होणाऱ्या आजारांची माहिती दिली. मोकळ्या हाताने कचरा हाताळल्यास विविध प्रकारच्या संसर्गाची लागण होते. तसेच, टीबी, हिपेटायटिस, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा, डायरिया, निमोनिया इत्यादी गंभीर आजार जडतात. परिणामी, स्वच्छता कामगारांची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी व त्यांच्यावर आवश्यक सुरक्षात्मक उपचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य