शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने दिलेले वचन पाळावे, लाडक्या बहिणींना कोणताही भेदभाव न करता २१००₹ द्यावे: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 06:10 IST

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे. कोणतेही निकष न लावता, कुठलाही भेदभाव न करता लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावे, अशी मागणी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

सध्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी आवडत्या नावडत्या आमदारांचीच अधिक चर्चा आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीच ओळख आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप नाही त्यामुळे अधिवेशनात एकही मंत्री प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे चित्र आहे. हे अधिवेशन म्हणजे विनोदच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नेहरू, सावरकरांवर टीका करणे दोघांनीही सोडावे 

काँग्रेसने यापुढे वीर सावरकरांवर आणि भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करू नये. दोन्ही पक्षांनी भविष्याबद्दल बोलले पाहिजे. गत काळात परिस्थितीनुसार या महापुरुषांनी जे शक्य होते ते केले, असा सल्ला देत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना