शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सरकारने दिलेले वचन पाळावे, लाडक्या बहिणींना कोणताही भेदभाव न करता २१००₹ द्यावे: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 06:10 IST

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे. कोणतेही निकष न लावता, कुठलाही भेदभाव न करता लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावे, अशी मागणी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

सध्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याऐवजी आवडत्या नावडत्या आमदारांचीच अधिक चर्चा आहे. ज्यांच्यावर आरोप केले त्यांचीच ओळख आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागत आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खातेवाटप नाही त्यामुळे अधिवेशनात एकही मंत्री प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे चित्र आहे. हे अधिवेशन म्हणजे विनोदच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नेहरू, सावरकरांवर टीका करणे दोघांनीही सोडावे 

काँग्रेसने यापुढे वीर सावरकरांवर आणि भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करू नये. दोन्ही पक्षांनी भविष्याबद्दल बोलले पाहिजे. गत काळात परिस्थितीनुसार या महापुरुषांनी जे शक्य होते ते केले, असा सल्ला देत मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचे काय झाले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना