शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सोमवारपासून सुरू होणारे नागपूरचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार

By यदू जोशी | Updated: December 9, 2017 05:27 IST

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे. शेतकºयांची कर्जमाफी, बोंडअळीने झालेले पिकांचे नुकसान, कायदा व सुव्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा, समृद्धी महामार्ग, आयटी विभागाचा घोळ, शिक्षण खात्याचे काही निर्णय आदी मुद्यांवर विरोधक हल्लाबोल करतील,असे चित्र आहे. तर विरोधकांचे हल्ले अत्यंत आक्रमकपणे परतवून लावण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे.कर्जमाफीपासून विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार गृहपाठ केला असून विरोधकांच्या संभाव्य आरोपांना परतवून लावण्यासाठी आकडेवारीसह सर्व दारूगोळा तयार ठेवला आहे. दुसरीकडे रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित चहापानावर विरोधक नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.१२ डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे विधिमंडळावर शेतकºयांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद या मोर्चाचे नेतृत्व करतील. या मोर्चाने विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला तर त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटतील. राष्ट्रवादीने राज्यभर हल्लाबोल मार्चे काढून आधीच सरकारविरोधी वातावरण पेटविले आहे.या अधिवेशनादरम्यान गुजरात निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबरला लागणार असून त्या निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील. भाजपाला विजय मिळाल्यास सरकार आत्मविश्वासाने कामकाज चालवेल, आणि फटका बसला तर विरोधक अधिक आक्रमक होतील.विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड विजयी होताना काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटल्याचे उघड झाल्याने विरोधकांवर नामुष्की ओढावली आहे. १२ तारखेच्या निमित्ताने एकत्र येत असलेले विरोधी पक्ष त्याच एकीने विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात आक्रमक होतील का यावर बरेच काही अवलंबून असेल. लाड यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना यांच्यात दिसलेली एकी अधिवेशनात दिसते का हाही औत्सुक्याचा विषय असेल.गोंधळापेक्षा चर्चा करा, प्रत्येकआरोपाचे उत्तर देतो : मुख्यमंत्रीविधिमंडळाच्या अधिवेशनात गोंधळ घालण्याकडेच विरोधकांचा कल दिसून आला आहे. यावेळी तरी त्यांनी चर्चा करावी म्हणजे त्यांच्या एकेक प्रश्नाचे सडेतोड उत्तर मी देईन, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आव्हान दिले. लोकमतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकºयांची आजची अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच झाली अन् आज ते हल्लाबोल करायला निघाले आहेत. आम्ही राज्याच्या हितासाठी काय केले याची यादी तर आमच्याकडे आहेच पण त्यांच्या पापांचा हिशेबही आहे. तो आता सांगावाच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.अपयशी सरकारला जाबविचारणारच : राधाकृष्ण विखे पाटीलकर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकºयांचीचेष्टा चालविली आहे. कायदा व सुव्यवस्था राज्यात राहिलेली नाही. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असलेल्या फडणवीस सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, आमची कामगिरी दमदार असे सांगणाºया सरकारने राज्याच्या हितासाठी काय केले? या सरकारचा मी लाभार्थीम्हणून जाहिरातबाजी केली पण सरकारी योजनांच्या अपयशाची पोलखोल आम्ही अधिवेशनात करू. १२ तारखेच्या मोर्चानंतर आम्ही सभागृहात सरकारविरुद्धमोर्चा उघडू.

टॅग्स :BJPभाजपाChipi airportचिपी विमानतळcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस