शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:21 IST

विधिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

Jayant Patil ( Marathi News ) :  नागपूर- आज विधिमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. " राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात सरकार कमी पडत आहे, या सरकारच्या काळात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस खात्यात पोलिस भरती करण्याची सरकार का टाळत आहे हे कळत नाही, असा असालही आमदार पाटील यांनी केला. उडता पंजाब सारखा आता उडता महाराष्ट्र करण्यासारख सुरू आहे, ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे, असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.

भुजबळांची धाकधूक वाढणार: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ जण माफीचे साक्षीदार? सुनावणी होणार!

"राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा सुरू आहे, सरकारकडे असणाऱ्या पैशापेक्षा मागणी जास्त आहे. काल मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं यात शेतकऱ्यांना मदतीचं सांगितलं. म्हणजे जर मार्च आधी सरकारला ते द्यायचे असतील तर सरकारला आता १ लाख ६० हजार कोटींची गरज आहे. मार्चच्या आधी एवढ उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. सदस्यांनी मागणी करायची ती पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करायची या पद्धतीने कधीच काम पूर्ण होणार नाही. या सरकारने १ लाख कोटींची हमी घेतली आहे. हमी घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. एमएमआरडी सारखी संस्था पूर्ण अडचणीत आली आहे, म्हाडासारखी संस्थाही पूर्ण अडचणीत आली आहे. राज्यातील सिंचन योजनाही अडचणीत आल्या आहेत, असंही आमदार पाटील म्हणाले. 

"आधी महिलांचं संरक्षण करा"

आमचा अयोध्येला विरोध नाही. आधी आमच्या सीतामायेला संरक्षण द्या, राज्यातील महिलांचे संरक्षण करा. महाराष्ट्रात ८ हाजारांहून अधिक दंगली झाल्या, बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. आपल्या राज्यात दंगली घडण्याचा विक्रम झाला आहे. रामनवमीला हल्ली दंगली होत आहेत. कोल्हापुरातही झाली. कोल्हापुरात माणसं कुठून आली माहित नाही, पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले मी फडतूस नाही काडतूस आहे, पण नागपूरात हे काय सुरू आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. रोज तीन घरात चोरी होतात. या वर्षी २५० पर्यंत चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगाराचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर काम करावं, असंही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस