शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:21 IST

विधिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

Jayant Patil ( Marathi News ) :  नागपूर- आज विधिमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. " राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात सरकार कमी पडत आहे, या सरकारच्या काळात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस खात्यात पोलिस भरती करण्याची सरकार का टाळत आहे हे कळत नाही, असा असालही आमदार पाटील यांनी केला. उडता पंजाब सारखा आता उडता महाराष्ट्र करण्यासारख सुरू आहे, ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे, असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.

भुजबळांची धाकधूक वाढणार: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ जण माफीचे साक्षीदार? सुनावणी होणार!

"राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा सुरू आहे, सरकारकडे असणाऱ्या पैशापेक्षा मागणी जास्त आहे. काल मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं यात शेतकऱ्यांना मदतीचं सांगितलं. म्हणजे जर मार्च आधी सरकारला ते द्यायचे असतील तर सरकारला आता १ लाख ६० हजार कोटींची गरज आहे. मार्चच्या आधी एवढ उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. सदस्यांनी मागणी करायची ती पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करायची या पद्धतीने कधीच काम पूर्ण होणार नाही. या सरकारने १ लाख कोटींची हमी घेतली आहे. हमी घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. एमएमआरडी सारखी संस्था पूर्ण अडचणीत आली आहे, म्हाडासारखी संस्थाही पूर्ण अडचणीत आली आहे. राज्यातील सिंचन योजनाही अडचणीत आल्या आहेत, असंही आमदार पाटील म्हणाले. 

"आधी महिलांचं संरक्षण करा"

आमचा अयोध्येला विरोध नाही. आधी आमच्या सीतामायेला संरक्षण द्या, राज्यातील महिलांचे संरक्षण करा. महाराष्ट्रात ८ हाजारांहून अधिक दंगली झाल्या, बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. आपल्या राज्यात दंगली घडण्याचा विक्रम झाला आहे. रामनवमीला हल्ली दंगली होत आहेत. कोल्हापुरातही झाली. कोल्हापुरात माणसं कुठून आली माहित नाही, पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले मी फडतूस नाही काडतूस आहे, पण नागपूरात हे काय सुरू आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. रोज तीन घरात चोरी होतात. या वर्षी २५० पर्यंत चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगाराचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर काम करावं, असंही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस