शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 15:21 IST

विधिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.

Jayant Patil ( Marathi News ) :  नागपूर- आज विधिमंडळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले. " राज्यातील महिलांना सुरक्षा देण्यात सरकार कमी पडत आहे, या सरकारच्या काळात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस खात्यात पोलिस भरती करण्याची सरकार का टाळत आहे हे कळत नाही, असा असालही आमदार पाटील यांनी केला. उडता पंजाब सारखा आता उडता महाराष्ट्र करण्यासारख सुरू आहे, ड्रग्ज माफियांना राजाश्रय देण्याचं काम सध्याचं सरकार करत आहे, असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.

भुजबळांची धाकधूक वाढणार: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ३ जण माफीचे साक्षीदार? सुनावणी होणार!

"राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा सुरू आहे, सरकारकडे असणाऱ्या पैशापेक्षा मागणी जास्त आहे. काल मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं यात शेतकऱ्यांना मदतीचं सांगितलं. म्हणजे जर मार्च आधी सरकारला ते द्यायचे असतील तर सरकारला आता १ लाख ६० हजार कोटींची गरज आहे. मार्चच्या आधी एवढ उत्पन्न वाढण्याची शक्यता नाही. सदस्यांनी मागणी करायची ती पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करायची या पद्धतीने कधीच काम पूर्ण होणार नाही. या सरकारने १ लाख कोटींची हमी घेतली आहे. हमी घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. एमएमआरडी सारखी संस्था पूर्ण अडचणीत आली आहे, म्हाडासारखी संस्थाही पूर्ण अडचणीत आली आहे. राज्यातील सिंचन योजनाही अडचणीत आल्या आहेत, असंही आमदार पाटील म्हणाले. 

"आधी महिलांचं संरक्षण करा"

आमचा अयोध्येला विरोध नाही. आधी आमच्या सीतामायेला संरक्षण द्या, राज्यातील महिलांचे संरक्षण करा. महाराष्ट्रात ८ हाजारांहून अधिक दंगली झाल्या, बिहारमध्ये ४ हजार दंगली झाल्या. आपल्या राज्यात दंगली घडण्याचा विक्रम झाला आहे. रामनवमीला हल्ली दंगली होत आहेत. कोल्हापुरातही झाली. कोल्हापुरात माणसं कुठून आली माहित नाही, पण दंगल झाली. आम्हीही हिंदू आहोत पण इतरांच्या अभिमानाला आपण डिवचून चालणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस एकदा म्हणाले मी फडतूस नाही काडतूस आहे, पण नागपूरात हे काय सुरू आहे. नागपूर गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. रोज तीन घरात चोरी होतात. या वर्षी २५० पर्यंत चोरीच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगाराचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर काम करावं, असंही जयंत पाटील म्हणाले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस