शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra : जगात कुठेही असलो तरी शपथविधीला येणार, त्यांच्या सूटला उंदरं लागली; अजित पवारांचा भरत गोगावलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:52 IST

सहा दिवसापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनचा सातवा दिवस झाला.

सहा दिवसापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनचा सातवा दिवस झाला. आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सभागृहात ठराव संमत करण्यात आला. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका केली, यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अनेक नेते मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. यामुळे आता दिल्लीला फोन करुन मंत्रिमंडळ विस्तार करुन टाका, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. 

"आमच्या काळात व्हायला हवं होतं, आम्हीही कमी पडलो"; अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली

'गोगावले साहेब तुम्ही सुट शिवून आणलेला कधी घालयाचा, अध्यक्ष महोदय खूप जणांचे सुट वाया निघाले आहेत. त्यांच्या घरचे विचारत आहेत हे सुट का शिवून आणले आहेत, भरत गोगावले साहेब यांचा शपथविधी असेल तेव्हा मी असेल तिथू उपस्थित राहणार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली

"महाराष्ट्राताला जर नंबर वन करायचं असेल तर आपल्या राज्यात असलेले प्रकल्प इतर राज्यांत जाऊ नयेत यासाठी आपणच काही तरी केलं पाहिजे. काही प्रकल्प विदर्भात आले होते, पण कामगारांच्या आंदोलनामुळे, कामगार-उद्योजक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकल्प बंद पडले किंवा दुसरीकडे निघून गेले. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर-चंद्रपूरातील प्रकल्पांची आपण माहिती घेतली पाहिजे, बुट्टीबोरीचा प्रकल्प किंवा आणखीही काही प्रकल्प होते. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ते झाले नाही. नंतर आमचेही सरकार आले, पण आम्हीही ते प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही. आमच्या काळात व्हायला हवं होतं. पण आम्हीही कमी पडलो," अशा शब्दांत अजित पवारांनी कबुली दिली आणि विदर्भाच्या विकासाबाबत भूमिका मांडली.

"आम्ही काही गोष्टीत कमी पडलो, मी फक्त तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही पण कमी पडलात, आम्ही पण कमी पडलो. त्यात विदर्भाचा काय दोष? आपल्या सर्वांना विदर्भाने, महाराष्ट्राने निवडून दिलं आहे त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी आताच्या सरकारने नवीन योजना आखल्या पाहिजेत. राज्यात आलेले किंवा येणारे प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजनाही केली पाहिजे", अशा शब्दांत अजित पवार यांना सभागृहात आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन