शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra : जगात कुठेही असलो तरी शपथविधीला येणार, त्यांच्या सूटला उंदरं लागली; अजित पवारांचा भरत गोगावलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 18:52 IST

सहा दिवसापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनचा सातवा दिवस झाला.

सहा दिवसापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनचा सातवा दिवस झाला. आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सभागृहात ठराव संमत करण्यात आला. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका केली, यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना टोला लगावला. 

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अनेक नेते मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. यामुळे आता दिल्लीला फोन करुन मंत्रिमंडळ विस्तार करुन टाका, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. 

"आमच्या काळात व्हायला हवं होतं, आम्हीही कमी पडलो"; अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली

'गोगावले साहेब तुम्ही सुट शिवून आणलेला कधी घालयाचा, अध्यक्ष महोदय खूप जणांचे सुट वाया निघाले आहेत. त्यांच्या घरचे विचारत आहेत हे सुट का शिवून आणले आहेत, भरत गोगावले साहेब यांचा शपथविधी असेल तेव्हा मी असेल तिथू उपस्थित राहणार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

अजित पवारांनी भरसभागृहात दिली कबुली

"महाराष्ट्राताला जर नंबर वन करायचं असेल तर आपल्या राज्यात असलेले प्रकल्प इतर राज्यांत जाऊ नयेत यासाठी आपणच काही तरी केलं पाहिजे. काही प्रकल्प विदर्भात आले होते, पण कामगारांच्या आंदोलनामुळे, कामगार-उद्योजक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे प्रकल्प बंद पडले किंवा दुसरीकडे निघून गेले. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर-चंद्रपूरातील प्रकल्पांची आपण माहिती घेतली पाहिजे, बुट्टीबोरीचा प्रकल्प किंवा आणखीही काही प्रकल्प होते. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना ते झाले नाही. नंतर आमचेही सरकार आले, पण आम्हीही ते प्रकल्प पूर्ण करू शकलो नाही. आमच्या काळात व्हायला हवं होतं. पण आम्हीही कमी पडलो," अशा शब्दांत अजित पवारांनी कबुली दिली आणि विदर्भाच्या विकासाबाबत भूमिका मांडली.

"आम्ही काही गोष्टीत कमी पडलो, मी फक्त तुम्हाला दोष देत नाही. तुम्ही पण कमी पडलात, आम्ही पण कमी पडलो. त्यात विदर्भाचा काय दोष? आपल्या सर्वांना विदर्भाने, महाराष्ट्राने निवडून दिलं आहे त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याच्या भल्यासाठी आताच्या सरकारने नवीन योजना आखल्या पाहिजेत. राज्यात आलेले किंवा येणारे प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजनाही केली पाहिजे", अशा शब्दांत अजित पवार यांना सभागृहात आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन