शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Winter Session Maharashtra 2022: अवमान, सीमाप्रश्नावर विरोधक आक्रमक; चहापानावर बहिष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 05:56 IST

यंदा विरोधासाठी विरोध नाही, चर्चेसाठी तयार असल्याची भूमिका

नागपूर : केवळ विरोधासाठी विरोध ही महाविकास आघाडीची भूमिका नाही. राज्यातील खरे प्रश्न व विधेयकांवर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार असल्याची भूमिका विरोधी पक्षांतर्फे मांडण्यात आली. परंतु, महापुरुषांचा सातत्याने होणारा अपमान, सीमाप्रश्न हाताळण्यात आलेले अपयश व विदर्भाच्या अनुशेषाबाबतची उदासीनता या मुद्द्यांवर विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी विरोधकांची भूमिका पत्रपरिषदेत मांडली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुनील केदार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते. 

महापुरुषांची सातत्याने अवहेलना होत असल्याने चहापानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिने झाले, पण सरकार अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. कर्नाटकातील ८६२ गावांवर महाराष्ट्र दावा करत होता, आज राज्यातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याचा ठराव करत आहेत. ६२ वर्षांत राज्यात असे चित्र कधीच दिसले नाही, असे सांगताना हे सरकार खोके सरकार होतेच, मात्र ते स्थगिती सरकारदेखील झाले आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

या मुद्द्यांवर सरकारला घेरणार

  • राज्यपाल, मंत्री, सत्तापक्षाच्या आमदारांकडून महापुरुषांचा अपमान.
  • कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकार आक्रमक नाही.
  • विदर्भाचा अनुशेष.
  • न मिळालेली अतिवृष्टी नुकसानभरपाई.
  • मोठे प्रकल्प राज्याबाहेर जाणे.
  • मागासवर्गीय, एससी-एसटी, अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती.
  • आमदार निधी, डीपीसी फंडात कपात.

अधिवेशन तीन आठवड्यांचे करा

  • सभागृहात सखोल चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे. सरकारी विधेयकांवरही चर्चा आवश्यक आहे. 
  • विदर्भ-मराठवाड्यावरील चर्चेचा अनुशेषदेखील कायम आहे. त्यामुळे यावेळी अधिवेशन तीन आठवड्यांसाठी घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.  

सर्व भागांना न्याय मिळावासरकारने ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज फक्त एमएमआरडीएसाठी घेतले आहे. विरोधी पक्ष कर्ज घेण्याच्या विरोधात नाही; पण त्याचा लाभ विदर्भ-मराठवाडा आणि राज्यातील इतर मागास भागांनाही मिळायला हवा, असे पवार म्हणाले.

प्रत्येकाचे नाक तपासामहाविकास आघाडीच्या नाकाखालून सरकार काढून नेल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. त्यासंदर्भात पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा शिवसेनेचा विषय असल्याचे फडणवीस म्हणतात मग त्याचे श्रेय घेतात. आता प्रत्येकाच्या नाकाची तपासणी झाली पाहिजे.

टॅग्स :nagpurनागपूरAjit Pawarअजित पवारBJPभाजपा