शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 19:24 IST

हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही.

नागपूर, दि. ३० डिसेंबर.

हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक आहे. अधिवेशनातून सरकारने ठोस काहीही दिले नाही, नागपूरचे अधिवेशन हे शेतकरी, तरुणवर्ग, महिला, छोटे, मध्यम व्यापारी सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसरणारे ठरले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारने धानाला हेक्टरी १५ हजार देण्याची घोषणा केली पण ही घोषणा केवळ धुळफेक आहे. मविआचे सरकार असताना क्विंटलला ७०० रुपये बोनस दिला जात होता आत्ताच्या घोषणेतून क्विंटलला केवळ ३०० ते ४०० रुपये मिळतील. सरकारने फक्त आकड्यांचा खेळ चालवला आहे. मविआ सरकारने सोयाबीन १२ हजार रुपये क्विंटलने तर कापूस १० हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केले होते.

सुरजागड प्रकल्पावरही ठोस भूमिका घेतली नाही. हा प्रकल्प भिलाईपेक्षाही मोठा होऊ शकतो. गडचिरोलीच्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. या प्रकल्पातून १ लाख लोकांना रोजगार मिळू शकतो तसेच राज्याचा विकासातही मोठा हातभार लागू शकतो पण दिल्लीच्या सांगण्यावरून या सरकारने एका उद्योगपतीच्या घशात तो प्रकल्प घातला आहे. तरुण मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असलेला एमपीएससीचा प्रश्न मांडला. ही परिक्षा सध्या जुना अभ्यासक्रमानुसार घ्यावी व २०२५ पासून नवीन पद्धतीने घ्यावी अशी मागणी केली होती पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. १८ हजार पोलीस भरतीचा दावा सरकार करत आहेत. ही नोकरी भरती मविआ सरकारच्या काळातच झाली असती पण कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. विदर्भातील उद्योग बाहेर गेले, मिहान मधील जमीन उद्योगांसाठी वाटल्या पण उद्योगच आले नाहीत.महाराष्ट्राला एक उज्ज्वल परंपरा आहे पण शिंदे-फडणवीस सरकारने खोक्याने विकत घेण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु केली आहे. या सरकारने राज्याची प्रतिमा कलंकित केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आणखी २० आमदार विकत घेऊन बहुमत सिद्ध करु. सत्तेची एवढी गुर्मी चढली आहे की तुम्ही कोणालाही विकत घ्यायला निघाले. सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कर्नाटकला त्यांच्याच भाषेत सुनावण्याची संधीही या सरकारने गमावली.विधानसभा अध्यक्षांनी विरोधी सदस्यांशी पक्षपातीपणा केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलूच दिले नाही. जयंत पाटील यांना निलंबित केले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीच सभागृहात गोंधळ घातला तसेच चर्चेविनाच महत्वाची विधेयकेही मंजूर करुन घेतली. जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही प्रयत्न केला पण विधानसभा अध्यक्ष बोलूच देत नव्हते. विधानसभा अध्यक्षांची एकूण भूमिका पाहता ते सभागृह चालवत होते, का भारतीय जनता पक्षाचे कार्यालय, हा प्रश्न पडतो. या अधिवेशनावर जवळपास २०० कोटी रुपयांचा खर्च झाल पण त्यातून जनतेच्या हिताचे काहीच निष्पन्न झाले नाही असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले