शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:21 PM

Foreign birds return , Nagpur newsपक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देऊन वाढल्याने घराची ओढ 

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत. हिवाळी पाहुणे जात असले तरी उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे मात्र आगमन सुरू झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर युराेप, अमेरिका, रशिया, मंगाेलिया अशा देशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी हजाराे किलाेमीटरचा प्रवास करीत आपल्या देशात आणि मजल-दरमजल करून विदर्भातही पाेहचत असतात. तलाव, पाणथळ जमिनी, शेतावर या पक्ष्यांची शाळा भरलेली असते. पावसाळा व पुढे हिवाळा असे चार-सहा महिने तरी त्यांचा मुक्काम येथे असताे. पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्यानुसार त्यांच्या मूळ अधिवासाकडे थंडी वाढत असल्याने ते आपल्याकडे माेर्चा वळवतात. यातील काही हिमालयातून व त्या पलीकडच्या देशातून येत असतात. वातावरणात गारवा राहत असल्याने त्यांना आकर्षण असते. यातील बहुतेक पक्षी केवळ उदर भरणाच्या गरजेपाेटी इकडे येतात, पण काही प्रजननाच्या दृष्टीनेही येतात. त्यामुळे अनेक पक्षी पिलांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र त्याबराेबर उन्हाळी पक्ष्यांचेही आगमन हाेत आहे.

 परतीला लागलेले हिवाळी पक्षी

मोठी टिबुकली, राजहंस, काळा ढोक, कांड्या करकोचा, कलहंस, गजरा, परी, सरग बड्डा, सुंदर बटवा, चिमण शेंदऱ्या, शेंदूर बड्डा, ठिपकेदार गरु, निलय, कुलंग, सोन टिटवा, लहान वाळू टिटवा आदी पक्षी हजाराेच्या संख्येने परतीच्या मार्गाला लागले आहेत.

उन्हाळी पाहुणे आले

नदी टिटवी, राखी डोक्याची टिटवी, मोठा आर्ली आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. याशिवाय आणखीही काही पक्ष्यांचे, मध्य आशिया, युराेप व हिमालयाच्या भागातून आगमन हाेणार आहे. उन्हाळ्यात येत असले तरी त्यांनाही पाणथळ जमिनीचाच आधार घ्यावा लागताे, हे विशेष.

हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीची सुरुवात झाली आहे. युरोप, मध्य आशिया, युरेशिया, मंगोलिया आदी भागातून येणारे हे विदेशी पक्षी पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन वाढू लागल्याने ते आता त्यांच्या मायदेशी परत जात आहेत.

 यादव तरटे पाटील, सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यnagpurनागपूर