शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

हिवाळ्यातील परदेशी पाहुणे लागले परतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:22 IST

Foreign birds return , Nagpur newsपक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत.

ठळक मुद्देऊन वाढल्याने घराची ओढ 

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : पक्ष्यांना काेणत्या देशाची सीमा थांबवू शकत नाही, असे म्हणतात. गेली चार-पाच महिने विदर्भातील नद्या, तलाव, पाणथळ जमिनी, शेतशिवार ज्यांच्या किलबिलाटाने फुलला हाेता, ते परदेशी पाहुणे आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. ऊन वाढू लागल्याने त्यांना आता थंड प्रदेशातील त्यांच्या घराची ओढ लागली असून, ते मार्गस्थ झाले आहेत. हिवाळी पाहुणे जात असले तरी उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे मात्र आगमन सुरू झाले आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर युराेप, अमेरिका, रशिया, मंगाेलिया अशा देशातील वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी हजाराे किलाेमीटरचा प्रवास करीत आपल्या देशात आणि मजल-दरमजल करून विदर्भातही पाेहचत असतात. तलाव, पाणथळ जमिनी, शेतावर या पक्ष्यांची शाळा भरलेली असते. पावसाळा व पुढे हिवाळा असे चार-सहा महिने तरी त्यांचा मुक्काम येथे असताे. पक्षी अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्यानुसार त्यांच्या मूळ अधिवासाकडे थंडी वाढत असल्याने ते आपल्याकडे माेर्चा वळवतात. यातील काही हिमालयातून व त्या पलीकडच्या देशातून येत असतात. वातावरणात गारवा राहत असल्याने त्यांना आकर्षण असते. यातील बहुतेक पक्षी केवळ उदर भरणाच्या गरजेपाेटी इकडे येतात, पण काही प्रजननाच्या दृष्टीनेही येतात. त्यामुळे अनेक पक्षी पिलांसह परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र त्याबराेबर उन्हाळी पक्ष्यांचेही आगमन हाेत आहे.

 परतीला लागलेले हिवाळी पक्षी

मोठी टिबुकली, राजहंस, काळा ढोक, कांड्या करकोचा, कलहंस, गजरा, परी, सरग बड्डा, सुंदर बटवा, चिमण शेंदऱ्या, शेंदूर बड्डा, ठिपकेदार गरु, निलय, कुलंग, सोन टिटवा, लहान वाळू टिटवा आदी पक्षी हजाराेच्या संख्येने परतीच्या मार्गाला लागले आहेत.

उन्हाळी पाहुणे आले

नदी टिटवी, राखी डोक्याची टिटवी, मोठा आर्ली आदी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. याशिवाय आणखीही काही पक्ष्यांचे, मध्य आशिया, युराेप व हिमालयाच्या भागातून आगमन हाेणार आहे. उन्हाळ्यात येत असले तरी त्यांनाही पाणथळ जमिनीचाच आधार घ्यावा लागताे, हे विशेष.

हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या परतीची सुरुवात झाली आहे. युरोप, मध्य आशिया, युरेशिया, मंगोलिया आदी भागातून येणारे हे विदेशी पक्षी पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऊन वाढू लागल्याने ते आता त्यांच्या मायदेशी परत जात आहेत.

 यादव तरटे पाटील, सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यnagpurनागपूर