शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

यंदा तरी हाेईल का प्रदूषणमुक्त दिवाळी? फटाक्यांपासून लांब राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 08:00 IST

Nagpur News गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता.

ठळक मुद्देगेल्यावर्षी गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या वर

निशांत वानखेडे

नागपूर : सध्या सुरू असलेला पाऊस पुढचे काही दिवस उघडीप देईल, अशी आशा आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहाला वेग येईल. मात्र हा आनंदाेत्सव फटाक्यांची आतषबाजी करूनच साजरा करावा का, हा गंभीर प्रश्न आहे. फटाके फाेडल्याने प्रदूषण तर हाेणारच आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांपासून दाेन हात लांब राहिलेले बरे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

काेराेनाकाळातील दाेन वर्षे काेणताही सण उत्साहात साजरा करता आला नाही. याची खंत हाेती. या काळात प्रदूषण झाले नसल्याचे समाधानही हाेते. दाेन वर्षे दाबलेला उत्साह गेल्यावर्षी जाेरात बाहेर आला आणि नागरिकांनी फटाक्यांची मनसाेक्त आतषबाजी केली. अपेक्षेप्रमाणे पुढे त्याचे परिणामही दिसले. गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता. शहरातील महाल, गांधीबाग, सीए राेड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्यूआय ३०० च्या आसपास गेला हाेता. पीएम-१० धूलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पाेहोचला हाेता. यावर्षी हा स्तर त्याही पलीकडे जाईल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

 गाेंगाटही फार

गेल्यावर्षी दिवाळीत ३ ते ५ नाेव्हेंबरदरम्यान नीरीने शहरातील दहा झाेनमध्ये अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे निरीक्षण केले. त्यात तब्बल ६२ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाने प्रचंड गाेंगाट झाल्याचे निदर्शनात आणले. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झाेनमध्ये ४६ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबल व १६ ठिकाणी ताे ८० डीबीच्या वर पाेहोचला हाेता.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना काॅपर, झिंक, लेड, साेडियम, मॅग्निशियम, कॅडमियम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जाताे. फटाके फाेडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्राेजन डायऑक्साईड, कार्बन माेनाक्साईड या वायूचे तसेच निकेल, कॅडमियम, क्राेमियम या जड धातूंचे प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धूलिकणांचा धाेकादायक स्तर वाढताे.

पाऊस आला तर...

नीरीच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाने सांगितले, सध्यातरी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर निरीक्षणासाठी उपकरण लावता येणार नाही. कदाचित पाऊस राहिला तर फटाक्यांची आतषबाजी कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. पाऊस थांबला तर निरीक्षण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pollutionप्रदूषण