शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

यंदा तरी हाेईल का प्रदूषणमुक्त दिवाळी? फटाक्यांपासून लांब राहण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 08:00 IST

Nagpur News गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता.

ठळक मुद्देगेल्यावर्षी गुणवत्ता निर्देशांक ३०० च्या वर

निशांत वानखेडे

नागपूर : सध्या सुरू असलेला पाऊस पुढचे काही दिवस उघडीप देईल, अशी आशा आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या उत्साहाला वेग येईल. मात्र हा आनंदाेत्सव फटाक्यांची आतषबाजी करूनच साजरा करावा का, हा गंभीर प्रश्न आहे. फटाके फाेडल्याने प्रदूषण तर हाेणारच आहे. त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांपासून दाेन हात लांब राहिलेले बरे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

काेराेनाकाळातील दाेन वर्षे काेणताही सण उत्साहात साजरा करता आला नाही. याची खंत हाेती. या काळात प्रदूषण झाले नसल्याचे समाधानही हाेते. दाेन वर्षे दाबलेला उत्साह गेल्यावर्षी जाेरात बाहेर आला आणि नागरिकांनी फटाक्यांची मनसाेक्त आतषबाजी केली. अपेक्षेप्रमाणे पुढे त्याचे परिणामही दिसले. गेल्यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत वायुप्रदूषणाचा निर्देशांक ३०० च्या पार गेला. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५० ते ३०० पर्यंत पाेहोचला हाेता. शहरातील महाल, गांधीबाग, सीए राेड, सदर, धरमपेठ, खामला, मानेवाडा या भागात एक्यूआय ३०० च्या आसपास गेला हाेता. पीएम-१० धूलिकणांचा स्तर ३५० ते ४०० पर्यंत पाेहोचला हाेता. यावर्षी हा स्तर त्याही पलीकडे जाईल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

 गाेंगाटही फार

गेल्यावर्षी दिवाळीत ३ ते ५ नाेव्हेंबरदरम्यान नीरीने शहरातील दहा झाेनमध्ये अनेक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे निरीक्षण केले. त्यात तब्बल ६२ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाने प्रचंड गाेंगाट झाल्याचे निदर्शनात आणले. हनुमाननगर, नेहरूनगर, आसीनगर, सतरंजीपुरा, लक्ष्मीनगर, लकडगंज व मंगळवारी झाेनमध्ये ४६ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचा स्तर ७५ ते ८० डेसिबल व १६ ठिकाणी ताे ८० डीबीच्या वर पाेहोचला हाेता.

फटाक्यांतून निघतात हे प्रदूषित वायू

फटाके तयार करताना काॅपर, झिंक, लेड, साेडियम, मॅग्निशियम, कॅडमियम यांसारख्या घातक धातूंचा वापर केला जाताे. फटाके फाेडल्यानंतर सल्फर डायऑक्साईड, नायट्राेजन डायऑक्साईड, कार्बन माेनाक्साईड या वायूचे तसेच निकेल, कॅडमियम, क्राेमियम या जड धातूंचे प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरते. शिवाय धूलिकणांचा धाेकादायक स्तर वाढताे.

पाऊस आला तर...

नीरीच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाने सांगितले, सध्यातरी पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर निरीक्षणासाठी उपकरण लावता येणार नाही. कदाचित पाऊस राहिला तर फटाक्यांची आतषबाजी कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. पाऊस थांबला तर निरीक्षण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :pollutionप्रदूषण