शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढ महागात पडणार, खासगी कंपन्यांचं वर्चस्व वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:09 IST

Nagpur : महावितरणचे कार्यरत व निवृत्त अधिकारी एमईआरसी आणि राज्य सरकारवर नाराज

आशीष राय लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) केलेल्या प्रचंड वीज दरवाढीमुळे महावितरणचे कार्यरत अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी नाराज आहेत. कारण, त्यांना वाटते की यामुळे केवळ अदानी, टाटा आणि टोरेंटसारख्या खासगी कंपन्यांनाच फायदा होईल. या तिन्ही कंपन्यांनी राज्यातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये समांतर परवान्यांसाठी अर्ज केले आहेत, जिथे महावितरण ही एकमेव वीज वितरक आहे. जर खासगी कंपन्यांनी आपले दर महावितरणच्या तुलनेत कमी ठेवले, तर या भागांतील बहुतांश ग्राहक महावितरणकडून वीज घेणे बंद करतील, अशी भीती आहे.

एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने 'लोकमत शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमईआरसीच्या मार्च महिन्यातील आदेशाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करून चूक केली. त्या आदेशात सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला होता. मात्र, आयोगाने आता याच निर्णयातून यू-टर्न घेतला असून, सर्वच ग्राहकांसाठी दरात मोठी वाढ केली आहे. राजकारणी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जरी दरकपात झाली असल्याचे सांगत असले, तरी सामान्य ग्राहकांना त्याचे खरे चित्र लवकरच समजेल. कारण नवीन दरानुसार बिलं आल्यानंतर दरवाढीचा फटका स्पष्टपणे जाणवेल.

महावितरणमधील एका कार्यरत अधिकाऱ्याने सांगितले की, अदानी, टाटा आणि टोरेंट यांच्याकडे महावितरणच्या तुलनेत नैसर्गिक फायदा आहे. कारण या खासगी कंपन्यांना शेतकरी व झोपडपट्टीमधील ग्राहकांसारख्या अनुदानित ग्राहकांना वीज पुरवायची गरज नाही. त्यामुळे त्यांचे दर स्वाभाविकच कमी असतील. त्या केवळ औद्योगिक, व्यावसायिक आणि उच्च व मध्यमवर्गीय गृह ग्राहकांकडे लक्ष देतील आणि हे ग्राहक वीज दर कमी असल्यामुळे सहजपणे त्यांच्याकडे वळतील. हे म्हणजे अप्रत्यक्ष खासगीकरणच आहे.

तसेच, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खासगी कंपन्या महावितरणच्या वितरण जाळ्याचा वापर करून चांगले पैसे देणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे वळवतील. या कंपन्यांना जाळे वापरासाठी काही शुल्क द्यावे लागेल, पण ते एमईआरसी ठरवेल, महावितरण नव्हे. आम्ही जरी खूप जास्त शुल्क मागितले तरी एमईआरसी ते नियमांनुसार कमी करून देईल. त्यामुळे आम्हाला स्पर्धेत टिकून राहता येणार नाही.

महावितरणमधील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, जेव्हा वीजपुरवठा खंडित होईल, तेव्हा त्या दोषाचे खापर आमच्यावर फोडले जाईल. कारण खासगी कंपन्याही आमच्या जाळ्याचा वापर करतील. त्या त्यांच्या ग्राहकांना सांगतील की खंडित वीजपुरवठा त्यांच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे स्वस्त वीज दिल्याबद्दल श्रेय त्यांना मिळेल, पण अपयशाचं दोषारोपण मात्र आमच्यावर होईल. जर राज्य सरकार आणि एमईआरसी यांना खरंच समान संधी असलेली स्पर्धा हवी असेल, तर खासगी कंपन्यांनी स्वतःचं वितरण जाळं उभारावं. त्यानंतर त्यांच्या ग्राहकांच्या त्रासाबद्दल आमच्यावर जबाबदारी येणार नाही.

मुंबईतील सध्याचे घरगुती वीज दर (प्रति युनिट)युनिट्सचा स्लॅब          महावितरण           टाटा                अदानी० ते १०० युनिट्स          ५.१४ रुपये          ४.७६ रुपये         ५.८३ रुपये१०१ ते ३०० युनिट्स      १२.५७ रुपये        ७.९६ रुपये          ८.८८ रुपये३०१ ते ५०० युनिट्स     १६.८५ रुपये        १३.५५ रुपये         ९.८८ रुपये५०० पेक्षा अधिक         १९.१५ रुपये         १४.५५ रुपये        ११.११ रुपये

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर