शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीला न्यायालयात आव्हान देणार

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2024 16:22 IST

नाना पटोले : व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर निघावी

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारकडवाडी येथे मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आले. निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीत गडबड केली आहे. आम्ही उत्तर मागितले तर निवडणूक आयोगाने ती वेबसाईटवरून काढून टाकली. रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचा पाप झाले. या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.   

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, हे सरकार जनभावनेचे नाही अशी चर्चा आहे. अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेतले जात आहे. आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आंदोलन झाले. व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर आली पाहिजे. ती पाहून दुसऱ्या पेटीत टाकता येईल, अशी व्यवस्था करा. अनेक डेमो आले, त्यामुळे शंका दूर करण्याचे काम आयोगाने केले पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारने मोर्चा काढायचा नाही असा फतवा काढला आहे. विधानसभेत पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावर अभिनंदन बाजूला ठेवून राजकीय भाषण केल्याचा राजकीय माज दिसून आला. सत्तापक्षातील आमदार स्वतःला खरच आपण निवडून आलो आहोत का हे पाहत आहेत. देशात विरोधीपक्ष नसावा, केवळ सत्तापक्षा असावा असे हे कृत्य सुरू आहे. संघ आणि भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसल्याने भ्रष्टाचारी एका माणसाला श्रीमंत बनवण्याचा काम सुरू असून त्याच्या पैशाच्या भरवश्यावर लोकशाही विकत घेतली जात आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश श्रीलंका या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, तीच परिस्थिती सध्या भारतात आहे पाहायला मिळत आहे. अघोषित आणीबाणी आणली जात आहे. आधारभूत किंमतीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार असताना ते मान्य केले जात नाही आहे. मतदान झाल्यावर आपण गुलाम आहोत, असे वाटत असेल तर ते धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनभावना पाहिल्या आहे.

गटनेत्याने नाव हायकमांड ठरवेलराज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड होत असताना विरोधी पक्षनेत्याचाही मार्ग निघेल. नागपूर अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता पाहायला मिळेल. हायकामंड जे नाव पाठवेल तो गटनेता होईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन महिनाभर चालावेहिवाळी अधिवेशन एक महिना चालावे, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सरसकट कर्जमाफी, हमी भावात वाढ, दीड लाख पद भरणार या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. महागाई कशी कमी करणार ते सरकारने अधिवेशनात सांगावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर