शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीला न्यायालयात आव्हान देणार

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2024 16:22 IST

नाना पटोले : व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर निघावी

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारकडवाडी येथे मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आले. निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीत गडबड केली आहे. आम्ही उत्तर मागितले तर निवडणूक आयोगाने ती वेबसाईटवरून काढून टाकली. रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचा पाप झाले. या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.   

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, हे सरकार जनभावनेचे नाही अशी चर्चा आहे. अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेतले जात आहे. आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आंदोलन झाले. व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर आली पाहिजे. ती पाहून दुसऱ्या पेटीत टाकता येईल, अशी व्यवस्था करा. अनेक डेमो आले, त्यामुळे शंका दूर करण्याचे काम आयोगाने केले पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारने मोर्चा काढायचा नाही असा फतवा काढला आहे. विधानसभेत पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावर अभिनंदन बाजूला ठेवून राजकीय भाषण केल्याचा राजकीय माज दिसून आला. सत्तापक्षातील आमदार स्वतःला खरच आपण निवडून आलो आहोत का हे पाहत आहेत. देशात विरोधीपक्ष नसावा, केवळ सत्तापक्षा असावा असे हे कृत्य सुरू आहे. संघ आणि भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसल्याने भ्रष्टाचारी एका माणसाला श्रीमंत बनवण्याचा काम सुरू असून त्याच्या पैशाच्या भरवश्यावर लोकशाही विकत घेतली जात आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश श्रीलंका या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, तीच परिस्थिती सध्या भारतात आहे पाहायला मिळत आहे. अघोषित आणीबाणी आणली जात आहे. आधारभूत किंमतीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार असताना ते मान्य केले जात नाही आहे. मतदान झाल्यावर आपण गुलाम आहोत, असे वाटत असेल तर ते धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनभावना पाहिल्या आहे.

गटनेत्याने नाव हायकमांड ठरवेलराज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड होत असताना विरोधी पक्षनेत्याचाही मार्ग निघेल. नागपूर अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता पाहायला मिळेल. हायकामंड जे नाव पाठवेल तो गटनेता होईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन महिनाभर चालावेहिवाळी अधिवेशन एक महिना चालावे, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सरसकट कर्जमाफी, हमी भावात वाढ, दीड लाख पद भरणार या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. महागाई कशी कमी करणार ते सरकारने अधिवेशनात सांगावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर