शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीला न्यायालयात आव्हान देणार

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2024 16:22 IST

नाना पटोले : व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर निघावी

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारकडवाडी येथे मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आले. निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीत गडबड केली आहे. आम्ही उत्तर मागितले तर निवडणूक आयोगाने ती वेबसाईटवरून काढून टाकली. रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचा पाप झाले. या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.   

बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, हे सरकार जनभावनेचे नाही अशी चर्चा आहे. अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेतले जात आहे. आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आंदोलन झाले. व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर आली पाहिजे. ती पाहून दुसऱ्या पेटीत टाकता येईल, अशी व्यवस्था करा. अनेक डेमो आले, त्यामुळे शंका दूर करण्याचे काम आयोगाने केले पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारने मोर्चा काढायचा नाही असा फतवा काढला आहे. विधानसभेत पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावर अभिनंदन बाजूला ठेवून राजकीय भाषण केल्याचा राजकीय माज दिसून आला. सत्तापक्षातील आमदार स्वतःला खरच आपण निवडून आलो आहोत का हे पाहत आहेत. देशात विरोधीपक्ष नसावा, केवळ सत्तापक्षा असावा असे हे कृत्य सुरू आहे. संघ आणि भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसल्याने भ्रष्टाचारी एका माणसाला श्रीमंत बनवण्याचा काम सुरू असून त्याच्या पैशाच्या भरवश्यावर लोकशाही विकत घेतली जात आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश श्रीलंका या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, तीच परिस्थिती सध्या भारतात आहे पाहायला मिळत आहे. अघोषित आणीबाणी आणली जात आहे. आधारभूत किंमतीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार असताना ते मान्य केले जात नाही आहे. मतदान झाल्यावर आपण गुलाम आहोत, असे वाटत असेल तर ते धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनभावना पाहिल्या आहे.

गटनेत्याने नाव हायकमांड ठरवेलराज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड होत असताना विरोधी पक्षनेत्याचाही मार्ग निघेल. नागपूर अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता पाहायला मिळेल. हायकामंड जे नाव पाठवेल तो गटनेता होईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन महिनाभर चालावेहिवाळी अधिवेशन एक महिना चालावे, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सरसकट कर्जमाफी, हमी भावात वाढ, दीड लाख पद भरणार या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. महागाई कशी कमी करणार ते सरकारने अधिवेशनात सांगावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर