शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पतीने वैवाहिक वादामुळे आत्महत्या केल्यास पत्नी जबाबदार नाही; हायकोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:36 IST

Nagpur : वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील कलह सामान्य बाब आहे. त्यामुळे पतीने केवळ अशा कलहातून आत्महत्या केल्यास त्याकरिता पत्नीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणामध्ये दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील कलह सामान्य बाब आहे. त्यामुळे पतीने केवळ अशा कलहातून आत्महत्या केल्यास त्याकरिता पत्नीला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणामध्ये दिला.

हे प्रकरण अमरावती येथील आहे. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पतीने आत्महत्या केल्यामुळे राजापेठ पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. पत्नी ही पतीला शिवीगाळ व मारहाण करीत होती.

क्षुल्लक कारणांवरून भांडण करून माहेरी जात होती. पतीला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देत होती. पैशांची मागणी करीत होती. तिचे विवाहबाह्य संबंधही होते. त्यामुळे पतीने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. न्यायालयाने केवळ या आरोपांमुळे पत्नीला पतीच्या आत्महत्येकरिता जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. या दाम्पत्यामध्ये तीव्र मतभेद होते. आत्महत्येच्या घटनेपूर्वी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप करून पोलिस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. पतीदेखील शारीरिक-मानसिक छळ करतो व त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, असे पत्नीचे म्हणणे होते. परंतु, पतीने आत्महत्या करावी, असा तिचा हेतू होता आणि तिने पतीसमोर आत्महत्या करण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय शिल्लक ठेवला नव्हता, असे पोलिसांच्या तपासात आढळून आले नाही. तसेच, सासऱ्याची तक्रार जशीच्या तशी मान्य केली तरी, पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी पत्नीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कृती केल्याचे दिसून येत नाही, असे न्यायालय म्हणाले.

वादग्रस्त एफआयआर रद्द

पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे आढळून आल्यामुळे ती याचिका मंजूर करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife not responsible for husband's suicide due to marital dispute: High Court

Web Summary : The High Court ruled a wife isn't responsible if her husband commits suicide due to marital disputes. Arguments alone aren't enough to establish culpability, unless direct incitement is proven. The court quashed the FIR against the wife, citing lack of evidence.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी