शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 19:53 IST

Nagpur News बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे.

 

नागपूर : बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही तरुणाईसाठी चिंतेची आणि काळजीची बाब आहे. व्यसन, जीवनशैलीत झालेले बदल, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी न घेणे या बाबी यासाठी कारणीभूत ठरत आहे. ताण (स्ट्रेस), धूम्रपान (स्मोकिंग), साखर (शुगर), मिठ (सॉल्ट) आणि बैठी जीवनशैली (सिडेंट्री लाइफस्टाइल) हे हृदयाचे पाच शत्रू आहेत. या पाच शत्रूंना दूर ठेवले तर हृदयविकाराला दूर ठेवता येते.

 

..अशी आहेत लक्षणे

- डाव्या हातात जळजळ, छातीत, पाठीत डावीकडे जळजळ, खांदेदुखी, घाम येणे, दम लागणे, धाप लागणे प्राथमिक संकेत असतात.

 

- तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

अनियमित जीवनशैली : नोकरी व कामाच्या ताणामुळे जीवनशैली अनियमित झाली आहे. जेवणाची, झोपण्याची वेळ निश्चित नाही. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करणे, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे बहुतांश तरुण हे मध्यरात्री झोपतात. पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चुकीचा आहार : हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते.

- व्यायामाचा अभाव : दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते.

मानसिक ताण : मानसिक ताण हे नकळत आपल्या हृदयावर परिणाम करतात.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

- पुरेशी झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण करून मोबाइलवर सोशल मीडिया पाहत राहणे बंद करा.

- संतुलित आहाराचे सेवन करा. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड खाणे टाळा. जेवण करताबरोबर झोप घेणे टाळा.

- नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रक्तसंक्रमण सुरळीत राहते.

- शरीरावरून सुदृढ दिसत असले तरी त्यात आजार दडलेला असू शकतो. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी आवश्यक तपासण्या कराव्या.

- तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो घालविण्यासाठी मित्रांशी बोलणे, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे असे उपाय योजून मन रमविण्याचा प्रयत्न करा.

 

‘नो युवर नंबर’ 

- वयाची तिशी ओलांडलेल्या तरुणांना वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ‘नो युवर नंबर’चा सल्ला आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक तरुणाने नियमित तपासणी करून आपले वजन, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. युवकांनी आहार व विहारावर लक्ष द्यावे. संतुलित आहार घ्यावा. आठवड्यातून किमान १५० मिनिट पायी चालावे. धूम्रपान, मद्यप्राशन यासारखी व्यसने टाळावी. छातीत जळजळ झाली तर ती ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- डॉ. प्रशांत जगताप

हृदयरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य