शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 19:53 IST

Nagpur News बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे.

 

नागपूर : बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही तरुणाईसाठी चिंतेची आणि काळजीची बाब आहे. व्यसन, जीवनशैलीत झालेले बदल, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी न घेणे या बाबी यासाठी कारणीभूत ठरत आहे. ताण (स्ट्रेस), धूम्रपान (स्मोकिंग), साखर (शुगर), मिठ (सॉल्ट) आणि बैठी जीवनशैली (सिडेंट्री लाइफस्टाइल) हे हृदयाचे पाच शत्रू आहेत. या पाच शत्रूंना दूर ठेवले तर हृदयविकाराला दूर ठेवता येते.

 

..अशी आहेत लक्षणे

- डाव्या हातात जळजळ, छातीत, पाठीत डावीकडे जळजळ, खांदेदुखी, घाम येणे, दम लागणे, धाप लागणे प्राथमिक संकेत असतात.

 

- तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

अनियमित जीवनशैली : नोकरी व कामाच्या ताणामुळे जीवनशैली अनियमित झाली आहे. जेवणाची, झोपण्याची वेळ निश्चित नाही. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करणे, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे बहुतांश तरुण हे मध्यरात्री झोपतात. पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चुकीचा आहार : हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते.

- व्यायामाचा अभाव : दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते.

मानसिक ताण : मानसिक ताण हे नकळत आपल्या हृदयावर परिणाम करतात.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

- पुरेशी झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण करून मोबाइलवर सोशल मीडिया पाहत राहणे बंद करा.

- संतुलित आहाराचे सेवन करा. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड खाणे टाळा. जेवण करताबरोबर झोप घेणे टाळा.

- नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रक्तसंक्रमण सुरळीत राहते.

- शरीरावरून सुदृढ दिसत असले तरी त्यात आजार दडलेला असू शकतो. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी आवश्यक तपासण्या कराव्या.

- तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो घालविण्यासाठी मित्रांशी बोलणे, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे असे उपाय योजून मन रमविण्याचा प्रयत्न करा.

 

‘नो युवर नंबर’ 

- वयाची तिशी ओलांडलेल्या तरुणांना वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ‘नो युवर नंबर’चा सल्ला आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक तरुणाने नियमित तपासणी करून आपले वजन, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. युवकांनी आहार व विहारावर लक्ष द्यावे. संतुलित आहार घ्यावा. आठवड्यातून किमान १५० मिनिट पायी चालावे. धूम्रपान, मद्यप्राशन यासारखी व्यसने टाळावी. छातीत जळजळ झाली तर ती ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- डॉ. प्रशांत जगताप

हृदयरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य