शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

तरूण वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 19:53 IST

Nagpur News बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे.

 

नागपूर : बदललेली जीवनशैली, वाढलेली स्पर्धा यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर येणारा हृदयरोग अवघ्या पंचविशीत येऊ लागला आहे. पूर्वी हार्ट अटॅक येण्याचे वय हे साधारण ६०च्या पुढे होते; पण आता ते वय ४० पर्यंत आले आहे. त्यामुळे कमी वयात हृदय कमकुवत होणे ही तरुणाईसाठी चिंतेची आणि काळजीची बाब आहे. व्यसन, जीवनशैलीत झालेले बदल, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी न घेणे या बाबी यासाठी कारणीभूत ठरत आहे. ताण (स्ट्रेस), धूम्रपान (स्मोकिंग), साखर (शुगर), मिठ (सॉल्ट) आणि बैठी जीवनशैली (सिडेंट्री लाइफस्टाइल) हे हृदयाचे पाच शत्रू आहेत. या पाच शत्रूंना दूर ठेवले तर हृदयविकाराला दूर ठेवता येते.

 

..अशी आहेत लक्षणे

- डाव्या हातात जळजळ, छातीत, पाठीत डावीकडे जळजळ, खांदेदुखी, घाम येणे, दम लागणे, धाप लागणे प्राथमिक संकेत असतात.

 

- तारुण्यात हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे

अनियमित जीवनशैली : नोकरी व कामाच्या ताणामुळे जीवनशैली अनियमित झाली आहे. जेवणाची, झोपण्याची वेळ निश्चित नाही. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम करणे, सोशल मीडियाचे व्यसन यामुळे बहुतांश तरुण हे मध्यरात्री झोपतात. पुरेशी झोप होत नाही. जेवणाच्या वेळा अनियमित असतात. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चुकीचा आहार : हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड यांसारख्या गोष्टींमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयरोगाची समस्या उद्भवते.

- व्यायामाचा अभाव : दिवसभर बसून काम असल्याने शरीर एकप्रकारे आखडते. शरीराला पुरेशी हालचाल नसल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो आणि हृदयविकारासारख्या समस्येला ऐन तारुण्यात सामोरे जाण्याची वेळ येते.

मानसिक ताण : मानसिक ताण हे नकळत आपल्या हृदयावर परिणाम करतात.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

- पुरेशी झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत जागरण करून मोबाइलवर सोशल मीडिया पाहत राहणे बंद करा.

- संतुलित आहाराचे सेवन करा. मैदा, तेल, मसालेदार पदार्थ, साखर, फॅटी फूड खाणे टाळा. जेवण करताबरोबर झोप घेणे टाळा.

- नियमित व्यायाम केल्याने शरीरातील रक्तसंक्रमण सुरळीत राहते.

- शरीरावरून सुदृढ दिसत असले तरी त्यात आजार दडलेला असू शकतो. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांनी आवश्यक तपासण्या कराव्या.

- तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर तो घालविण्यासाठी मित्रांशी बोलणे, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे असे उपाय योजून मन रमविण्याचा प्रयत्न करा.

 

‘नो युवर नंबर’ 

- वयाची तिशी ओलांडलेल्या तरुणांना वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ‘नो युवर नंबर’चा सल्ला आम्ही देतो. म्हणजे प्रत्येक तरुणाने नियमित तपासणी करून आपले वजन, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. युवकांनी आहार व विहारावर लक्ष द्यावे. संतुलित आहार घ्यावा. आठवड्यातून किमान १५० मिनिट पायी चालावे. धूम्रपान, मद्यप्राशन यासारखी व्यसने टाळावी. छातीत जळजळ झाली तर ती ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- डॉ. प्रशांत जगताप

हृदयरोग तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य