शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम का रखडले? हायकोर्टाची विचारणा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 8, 2023 17:23 IST

उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

नागपूर : कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील चंद्रभागा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम का रखडले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात ॲड. अरविंद वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या पुलासाठी नाबार्डने २०१८-१९ मध्ये तीन कोटी रुपये मंजूर केले. परंतु, भूमीपूजन जानेवारी-२०२२ मध्ये करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामाला मे-२०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जुलै-२०२२ मध्ये काम बंद पडले. गोवरी येथे आधी केवळ अडीच फुट उंचीचा पुल होता. पावसाळ्यात हा पुल नेहमीच पाण्याखाली राहत होता. या पुलामुळे सहा व्यक्तीचा मृत्यूही झाला.

नवीन पुलासाठी जुना पुल पाडण्यात आला आहे. दरम्यान, नवीन पुलाचे बांधकाम थंडबस्त्यात गेले. परिणामी, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कळमेश्वर, खैरी, पारडी, गोवरी, तोंडाखैरी, सिल्लौरी, बेलोरी, सेलू, परसोडी, बोरगाव, झुनकी, वाकीचे इत्यादी गावांतील नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर