शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:29 IST

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली.

ठळक मुद्देपत्नी किरणसह मांडला ‘वॉटर कप-२०१८’ चा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने पत्नी किरणसह वॉटर कप-२०१८ चा लेखाजोखा मांडला. आमिर पुढे म्हणाला, यंदा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. पाणलोटसाठी यंदा २० हजार गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून ते आपआपल्या गावात जाऊन इतर गावकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करणार आहेत, याकडेही आमिरने लक्ष वेधले.१ मे ला महाश्रमदानपाण्याच्या बचतीचा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या महाश्रमदानात सहभागासाठी आतापर्यंत सव्वा लाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. नावनोंदणीची ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आमिरने यावेळी दिली.‘आझाद’लाही कळते पाण्याचे मोलपाणी बचतीची ही मोहीम आम्ही स्वत:च्या घरापासून सुरू केली. मी आणि किरण दोघेही पाण्याचा काटकसरीने उपयोग करतो. इतकेच नाही तर आमचा मुलगा आझाद यालाही आम्ही हीच शिकवण दिली आहे. तो आता फक्त सहा वर्षांचा आहे. पण, त्यालाही पाण्याचे मोल कळते. तो अजिबात पाणी वाया घालवत नाही, हे आमिरने आवर्जून सांगितले.गावकऱ्यांची एकता बघून बळ मिळतेया पत्रकार परिषदेतनंतर शहरातील प्रमुख दैैनिकांच्या संपादकांशी आमिर व किरण खानने अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत आमिर म्हणाला, गावातील लोक खूप प्रामाणिक व धैर्यवान आहेत. प्रतिकूल स्थितीतही त्यांनी आशा सोडली नाही. पाणलोट विकासाच्या कामावर त्यांची एकता मी बघितली आहे व त्यातून मला मोठे बळही मिळत असते. याच क्रमात लोकमतने घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा आहे. लोकमतने राबविलेल्या जलमित्र अभियानाचे चांगले परिणाम राज्यात दिसल्याचे आमिरने कौतुकाने सांगितले. या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांची आर्थिक स्थिती बदलली असून, आता शेतकरी वर्षातून दोनदा उत्पादन घेत आहेत, याकडे किरणने संपादकांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर