शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा : आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:29 IST

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली.

ठळक मुद्देपत्नी किरणसह मांडला ‘वॉटर कप-२०१८’ चा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून जनसमृध्दीकडे नेणारा हा प्रवास खरच नेत्रदीपक आहे. या प्रवासाचा सातत्याने विस्तार व्हावा आणि एक दिवस समग्र महाराष्ट्र ‘पाणीदार’ व्हावा, अशी अपेक्षा अभिनेता आमिर खान याने व्यक्त केली. मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत आमिरने पत्नी किरणसह वॉटर कप-२०१८ चा लेखाजोखा मांडला. आमिर पुढे म्हणाला, यंदा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. पाणलोटसाठी यंदा २० हजार गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले असून ते आपआपल्या गावात जाऊन इतर गावकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करणार आहेत, याकडेही आमिरने लक्ष वेधले.१ मे ला महाश्रमदानपाण्याच्या बचतीचा संदेश आणखी प्रभावीपणे देण्यासाठी पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे. या महाश्रमदानात सहभागासाठी आतापर्यंत सव्वा लाख जलमित्रांनी आपले नाव नोंदवले आहे. नावनोंदणीची ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आमिरने यावेळी दिली.‘आझाद’लाही कळते पाण्याचे मोलपाणी बचतीची ही मोहीम आम्ही स्वत:च्या घरापासून सुरू केली. मी आणि किरण दोघेही पाण्याचा काटकसरीने उपयोग करतो. इतकेच नाही तर आमचा मुलगा आझाद यालाही आम्ही हीच शिकवण दिली आहे. तो आता फक्त सहा वर्षांचा आहे. पण, त्यालाही पाण्याचे मोल कळते. तो अजिबात पाणी वाया घालवत नाही, हे आमिरने आवर्जून सांगितले.गावकऱ्यांची एकता बघून बळ मिळतेया पत्रकार परिषदेतनंतर शहरातील प्रमुख दैैनिकांच्या संपादकांशी आमिर व किरण खानने अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत आमिर म्हणाला, गावातील लोक खूप प्रामाणिक व धैर्यवान आहेत. प्रतिकूल स्थितीतही त्यांनी आशा सोडली नाही. पाणलोट विकासाच्या कामावर त्यांची एकता मी बघितली आहे व त्यातून मला मोठे बळही मिळत असते. याच क्रमात लोकमतने घेतलेला पुढाकारही महत्त्वाचा आहे. लोकमतने राबविलेल्या जलमित्र अभियानाचे चांगले परिणाम राज्यात दिसल्याचे आमिरने कौतुकाने सांगितले. या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांची आर्थिक स्थिती बदलली असून, आता शेतकरी वर्षातून दोनदा उत्पादन घेत आहेत, याकडे किरणने संपादकांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर