शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शहरातील श्वान नसबंदी केंद्रांवर नियंत्रण कुणाचे?

By निशांत वानखेडे | Updated: July 22, 2024 18:25 IST

माॅनिटरिंग टीमवर अनेक वर्षापासून ‘त्याच’ लाेकांचा समावेश : शस्त्रक्रियेदरम्यान जातात प्राण्यांचे जीव

निशांत वानखेडे

नागपूर : महापालिकेअंतर्गत चालणारे शेल्टर हाेम व नसबंदी केंद्र पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. मात्र या केंद्रांवर पुन्हा गैरप्रकार हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर कुणाचे लक्ष आहे व देखरेख ठेवणारी ‘माॅनिटरिंग टीम’ अस्तित्वात आहे काय, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या श्वान पथकाने वैशालीनगर भागातून एका श्वानाला उचलून नेले हाेते. ६-७ दिवस ठेवल्यानंतर त्याच्यावर भांडेवाडी एबीसी केंद्रावर शस्त्रक्रिया करून तसेच साेडून देण्यात आले. धक्कादायक म्हणजे या मादी श्वानाचे आतडे बाहेर आले हाेते. रस्त्यावर तिला खाऊ घालणारे यश पाठराबे यांनी तक्रार केल्यानंतर श्वानाला परत उचलण्यात आले व कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाडी येथून उचलून आणलेल्या एका श्वानासाेबत गाेरेवाडा एबीसी केंद्रावर हाच प्रकार घडला. अशाचप्रकारे प्रतापनगर येथून एका भाजीविक्रेत्या महिलेच्या घरात घुसून पाळीव श्वान उचलून नेण्यात आल्याचीही माहिती आहे. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यु झाल्याने ती महिलेला रडू आवरत नव्हते. अशा इतरही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे अनियमितता सुरू असताना अशा गैरप्रकारावर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

अनेक वर्षापासून मर्जीतले सदस्यवास्तविक प्राणी कल्याण मंडळ (एडब्ल्यूबीआय) च्या नियमानुसार नसबंदी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘माॅनिटरिंग टीम’ असणे बंधनकारक आहे. या टीमद्वारे शृवान कुठून पकडले, श्वान पकडणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या शस्त्रक्रिया, अवयवांची विल्हेवाट लावणे, एबीसी केंद्रातील राेजचा अहवाल तपासणे अशी देखरेख केली जाते. यात प्रशासनिक अधिकाऱ्यांसह दाेन एनजीओ असतात. मात्र महापालिकेची माॅनिटरिंग टीम अस्तित्वहिन असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १० वर्षापूर्वी ही टीम स्थापित करण्यात आली हाेती, त्यात नंतर कधीच बदल झाले नाहीत. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे शेल्टर हाेमचा कारभार आहे, तेच लाेक अनेक वर्षापासून या समितीवर असल्याचा आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीतले सदस्य ठेवल्याचा गंभीर आराेप ‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या स्मिता मिरे यांनी केला आहे.

सुरू करण्यापूर्वी मंजुरी घेतली काय?

वास्तविक मनपाअंतर्गत शहरात भांडेवाडी, गाेरेवाडा व महाराजबागसमाेर एबीसी केंद्र सुरू हाेते. मात्र या केंद्रांवर प्रचंड अव्यवस्था, गैरप्रकार हाेत असल्याचा ठपका ठेवत भारतीय प्राणी कल्याण मंडळ (एडब्ल्यूबीआय) ने तिन्ही केंद्रांवर बंदी घातली हाेती व आवश्यक गाेष्टींची पूर्तता केल्याशिवाय केंद्र सुरू करण्यास मनाई केली हाेती. एडब्ल्यूबीआयकडून त्यासाठी मंजुरी घेणे आवश्यक हाेते. मात्र गेल्या सहा महिन्यात या केंद्रांवर काेणत्या सुविधा उपलब्ध केल्या माहिती नाही, पण हे तिन्ही केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आले. याबाबत केंद्रांनी आवश्यक गाेष्टींची पूर्तता करून मंजूरी घेतली काय, असे विचारले असता एडब्ल्यूबीआयचे स्थानिक सदस्य अॅड. संजीव कपूर यांनी, याबाबत माहिती नसल्याचे व मुख्यालयी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर