शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शिक्षकांची ओळखपत्रे गेली कुठे? पोलिसांच्या दंडुक्याचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:04 IST

लॉकडाऊनमध्ये शिक्षण विभागाच्या कामासाठी शिक्षकांना आता ओळखपत्राची गरज भासते आहे. शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. पण देशभरात लागलेल्या संचारबंदीमुळे विना ओळखपत्र बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

ठळक मुद्देपोषण आहार वाटपाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईतर्फे जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील वर्ग १ ते ८ च्या प्राथमिक शिक्षकांना ओळखपत्र देण्यासाठी प्रती शिक्षक पन्नास रुपये अनुदान जिल्हा परिषदेकडे उपलब्ध करून दिले होते. परंतु गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांना ओळखपत्र देण्यात आले नाही. लॉकडाऊनमध्ये शिक्षण विभागाच्या कामासाठी शिक्षकांना आता ओळखपत्राची गरज भासते आहे. शासनाने शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे धान्य वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. पण देशभरात लागलेल्या संचारबंदीमुळे विना ओळखपत्र बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व जमावबंदी लागू असताना ओळ्खपत्राची गरज भासत आहे. शाळेच्या प्रशासकीय कामासाठी व शालेय पोषण आहार योजनेच्या धान्य वाटपासाठी शाळा मुख्याध्यापकांना राज्याचे शिक्षण संचालक, शिक्षण सचिवापासून तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी व शापोआ अधीक्षक फक्त आदेश जारी करीत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा, अनुदानित शाळांमधील बहुतांश शिक्षक हे शहरात वास्तव्यास आहेत. विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पोषण आहाराचे धान्य वाटप करायचे आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे. शक्य नसेल तर विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोषण आहार पोहचवून द्यायचा आहे. परंतु प्रत्यक्षात शाळेपासून दूरवर राहणाऱ्या शिक्षकांजवळ सरकारी ओळखपत्र नसल्याने पोलीस त्यांना माघारी घरी पाठवतात. संचारबंदीमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांचे दंडुके बसत आहेत. त्यामुळे शिक्षकसुद्धा घाबरले आहेत. अशात पोषण आहाराचे काम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनाने सर्व शिक्षकांना सरकारी ओळखपत्राची पूर्तता करण्याचे निर्देश जि.प. प्रशासनास द्यावेत, अशी मागणी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर, महेश जोशी आदींनी केली आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक