शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सहलीची बस रात्री घाटात बंद पडते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:54 IST

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेलोन्याचे विद्यार्थी मध्यरात्री सुखरूप पोहचले : सलील देशमुख यांचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (नरखेड) : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी सोमवारी चिखलदरा येथे सहलीला गेले. परंतु परत येत असताना चिखलदरा येथील घाटात सायंकाळी ६.३० वाजता बस बंद पडली. कोणतीही मदत मिळत नसल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली. इकडे मुले परत आली नसल्याने पालकही धास्तावले होते. शिक्षकांनी राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्याशी संपर्क केला. सलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला विनंती केली. शेवटी सर्व विद्यार्थी रात्री २ वाजता सुखरूप बेलोना येथे पोहोचले.बेलोना येथील मातोश्री सुमनबाई आश्रम शाळेचे ५४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक हे सोमवारी सकाळी चिखलदरा येथे सहलीकरिता निघाले. यासाठी त्यांनी काटोल आगाराची बस बुक केली होती. दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सर्व जण परतीच्या प्रवासासाठी निघाले. चिखलदरा येथून काही अंतरावर येताच बस बंद पडली. रात्रीची वेळ आणि घनदाट जंगल यामुळे सर्वच भयभीत झाले. मदतीसाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. परंतु कोणतीही मदत मिळत नव्हती. शेवटी शिक्षकांनी सलील देशमुख यांच्यासोबत संपर्क केला. सलील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी तसेच चिखलदऱ्याचे पोलीस निरीक्षक शिंदे व परतवाड्याचे पोलीस निरीक्षक मानेकर यांच्यासोबत संपर्क केला. यानंतर तातडीने चिखलदऱ्याचे ठाणेदार शिंदे यांनी घाटात अडकलेली बस गाठली. ज्या ठिकाणी ही बस अडली होती त्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे राहतात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलीस वाहनांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना परतवाडाकडे रवाना केले. तोपर्यंत देशमुख यांनी काटोल आगारप्रमुख डी.एम. रंगारी व परतवाडाचे आगारप्रमुख बालदे यांना सांगून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यास सांगितले. परतवाडा येथे पोहचल्यानंतर देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली. रात्री दोन वाजताच्या सुमारास सर्व विद्यार्थी सुखरूप बेलोना येथे पोहचले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा