शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कसले आले पोषण? हे तर बालकांचेच शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. परंतु नागपुरात मात्र निकृष्ट व भेसळयुक्त आहाराचाच अधिक पुरवठा झाल्याचे धक्कादायक वास्तवच समोर आले आहे. लोकमतने केलेल्या पाहणीत साखरेत चक्क पांढरे खडे आणि चुना मिसळलेला होता. तिखटातही भेसळ होती. हळदीला रंग नव्हता. मुग डाळीतही भेसळ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. हा पोषण आहार म्हणावा की शोषण आहार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. १ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरात एकूण ९८१ अंगणवाड्या आहेत. लहान मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ वाढावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून हा पोषण आहार दिला जातो. दर दोन महिन्यांनी हा आहार दिला जातो. यात तांदूळ (१९०० ग्रॅम), गहू (१९०० ग्रॅम,) मिरची पाावडर (२०० ग्रॅम), हळद (२०० ग्रॅम), मूगडाळ (१००० ग्रॅम), साखर (१००० ग्रॅम), मीठ (४०० ग्रॅम) आदी दिले जाते. दर दोन महिन्यांनी हा आहार लाभार्थ्यांना दिला जातो. हा आहार निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. रेशीमबाग प्रकल्पांतर्गत असलेल्या काही अंगणवाडीतील लाभार्थ्यांनीसुद्धा अशाच तक्रारी केल्या. लाेकमत चमुने प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तेव्हा त्यांनी त्यांना मिळालेल्या आहार दाखवला तेव्हा त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. हा प्रकार केवळ काही अंगणवाडीतील नव्हे तर सर्वच अंगणवाड्यांचा आहे. जरीपटका, तांडापेठ, बांग्लादेश आदी परिसरात या पोषण आहाराच्या तक्रारी झालेल्या आहेत.

लाभार्थी म्हणतात...

-तब्बल चार महिन्यांनंतर आहार मिळाला. घरी आल्यावर बंद पॉकेट उघडले तेव्हा साखरेत पांढरे खडे असल्याचे दिसून आले. चुना मिसळलेला होता. मिरची पावडरमध्ये, तर भेसळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. मूग दाळीत अनेक प्रकारच्या डाळी भेसळ आहेत.

-सूजित रामटेके, बाबू जगजीवनराम

- पोषण आहारत मिळत असलेल्या मिरची पावडरला काहीच चव नाही. त्यात भुसा मिसळला असल्याचे दिसून येते. तिखट पाण्यात विरघळत नाही. ही नेहमीचीच बाब आहे.

शुभांगी बोबडे, गरोबा मैदान

- पोषण आहारातील तिखट ही काहीच कामाची नाही. केवळ मूग डाळीतच भेसळ नाही, तर गहू सुद्धा निकृष्ट दर्जाचाच आहे. ही केवळ आजचीच बाब नाही तर हा नेहमीचाच प्रकार झाला आहे.

नताशा कांबळे, गरोबा मैदान